कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापताना दिसत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गड असणाऱ्या बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. राज्यात फोडाफोडीचे राजकारण देखील सुरू झाले असून, ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेस पक्षामधील अनेक मोठे नेते भाजपच्या गोटात सामील झाले आहे.
ममता बॅनर्जीचे अगदी जवळचे व माजी मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली होती. आता सुवेंदू अधिकारी यांना आव्हान देण्यासाठी स्वतः ममता बॅनर्जी मैदानात उतरणार आहेत.
ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या राजकीय गडात शक्ती प्रदर्शन करत नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. नंदीग्राममधून यंदा निवडणूक लढण्याचा विचार आपण केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुब्रत बक्षी यांनी आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी आपण त्यांना विनंती करीत आहोत, असेही बॅनर्जी म्हणाल्या.
तर दुसरीकडे, ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन, अशी गर्जनाच सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे.
Read Also :
- धनंजय मुंडे प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता – चित्रा वाघ
- दोन दिवसात मोठे हादरे देणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी कधीच बाहुबलीचे राजकारण केले नाही’
- ‘असं सरकार चालवता येत नाही’, ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे मुख्यमंत्र्याना प्रत्युत्तर
- ‘आप’ने महाराष्ट्रात उघडले खाते, मराठीत ट्विट करत केजरीवाल म्हणाले…