अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुका महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर लगेचेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
नाना पटोले यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, भाजपमधील अनेक नेते काँग्रेसमध्ये परतण्यास इच्छूक असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल, असे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले सध्या मिशन विदर्भ अंतर्गत विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. यावेळी ते बोलत होते.
धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्याच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करणार असल्याचे देखील यावेळी नाना पटोलेंनी सांगितले.
Read Also :
- ‘शिवसेनेला वचन पळणारा मित्र म्हणणे ही पवारांची राजकीय हतबलता’
- वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंपाठोपाठ आता आदित्य ठाकरेंनीही केले ‘हे’ आवाहन
- कोरोनारुग्ण आणि मृतांची आकडेवारी लपवली जात आहे ? आरोग्य विभाग म्हणाले…
- 12 वीच्या परीक्षांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती
- ‘वाघ हा वाघ असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर वाघाचे राज्य’