मुंबई : खेड येथील मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला लोकांची चांगलीच गर्दी जमली. त्यावरून राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रखर शब्दात टिका करण्यात आली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून त्याच मैदानावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याआधी भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर कडाडून टिका केली आहे. भास्कर जाधव चिपळूणचं बांडगुळ आहे. त्याला मी दोन कवडीची किंमत देत नाही. तो नाच्या आहे. त्याचा मेंदू सडला आहे. तो उपकारची जाणीवर न ठेवणारा माणूस आहे. इतका महानीच माणूस मी अख्या जगात कुठं बघितला आहे. खाल्लेल्या घराचे वासे मोजणारी औलाद भास्कर जाधव, अशी टिका रामदास कदम यांनी केली. त्याला आता भास्कर जाधव यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. त्याचबरोबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्याला गाडणार. त्याला पुन्हा विधानसभा बघू देणार नाही. असं आवाहनही दिलं आहे.
ज्यांच्यात नाही दम ते रामदास कदम असा पलटवार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केला. बाप माणूस एका मतदारसंघापुरता मर्यादित असेल तर हा मला काय करारा जवाब देणार. ? असा सवाल करीत बेडकी फुगली तरी सुद्धा डोंगर होऊ शकत नाही. बैल होऊ शकत नाही. रामदास कदम यांना मी स्वत: पराभूत केलेलं आहे. ते रामदास कदम माझा काय पराभव करणार. असा टोलाही त्यांनी लगावला. त्याचबरोबर खेड-दापोली मतदार संघात रामदास कदम यांनी आपल्या मुलाचं राजकीय भवितव्य संपवलेलं आहे. असंही त्यांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा…उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा
- हेही वाचा….पुणे भाजपचे शहराध्यपद बदलणार, पुढील आठवड्यात होणार घोषणा ?
- हेही वाचा….शिवसेना अन् धनुष्यबाणासंदर्भात निवडणुक आयोगाचं कोर्टाला पत्र, उद्धव ठाकरेंच्या टिकेवर उत्तर
- हेही वाचा….“सत्ता उंबरठ्यावर यायला लागली, मग ममता, समता, जयललिता, या सगळ्यांना बोलवण्यात आलं”, ठाकरेंचा भाजपला टोला
- हेही वाचा….“मग एकनाथ शिंदे कोण आहेत? उद्या कोणीही उठेल आणि म्हणेल मी शिवसेना,” कपिल सिब्बल यांनी आज कोर्ट गाजवलं