मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणात ठाकरे गटाच्या तरूण कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यावरून राज्यात सध्या राजकीय नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करतांना दिसत आहेत. यावर आता आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..“राज्यात मुका घ्या, मुका घ्या, सिनेमा सुरू, दादा कोंडके हवे होते, तरूणांना अटक कराल तर याद राखा,” संजय राऊत
प्रकाश सुर्वे यांनी याबाबत एक पत्रच लिहिलं आहे. तसेच शीतल म्हात्रे बहिणीसमान आहेत. व्हिडीओमध्ये गाणं लावून व्हायरल करणं हा महिलांचा अपमान आहे. या घडलेल्या प्रकारामुळे मनस्ताप झाला, माझं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न झाला. असंही त्यात सुर्वे यांनी म्हटलं आहे. माझे विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रकल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता मोर्फकरणे खोटे चारित्र्यहनन करणे अशा विकृत गोष्टी करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या पवारांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, भाजपने केला मोठा गट काबीज
छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण उभ्या महाराष्ट्राला दिली आहे. हिच शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही हीच शिकवण अंगी कारली आहे. या बनावट व्हिडीओ प्रकरणात मुंबई पोलिसांनी तडफेने कारवाई करत या षडयंत्रणाबाबत संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे तपासातून याबाबचे सत्य सामोरे येईलच अशाप्रकारे व्हिडीओ पसरवून लोकांचे लक्ष विचलित करता येईल. मात्र लोकांचे मन जिंकण्याकरीता लोकांमध्ये राहून लोकांची कामे करीत राहावी लागता. विरोधक आमच्या कामांमधून लोकांची कामे करण्याची प्रेरणा घेतील अशी मी अपेक्षा करतो.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंची आंतरराष्ट्रीय भरारी…! आदित्य ठाकरेंना २०२३ चा ‘यंग ग्लोबल लीडर अवार्ड’ जाहीर
दरम्यान या सर्व प्रकारामुळे माझे कुटुंबीय आणि मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. ज्या कुणी हा व्हिडीओ बनविला असेल त्यांना परमेश्वर सदबुद्धी देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..“राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं”, 4 पैकी एकच मुद्दा योग्य, न्यायाधीशांची मोठी टिप्पणी
- हेही वाचा…सभागृहात मंत्र्यांची अनुपस्थिती, अजित पवार संतापले, फडणवीसांनी दिलं उत्तर, सभागृहात एकच शांतता
- हेही वाचा…“तीन वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत राज्यपालांनी कसा मोडला?”, कोर्टात वारे फिरले, न्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी
- हेही वाचा…“..तर त्यातून सहानुभूतीची लाट निर्माण होईल,” महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उज्वल निकम यांचं मोठं विधान
- हेही वाचा.“भक्तांना वाटतंय भाजप सरकार आलं म्हणून संप निघायला लागलेत”, राष्ट्रवादीची भाजपवर टिका