मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या विविध मुद्यांवरून चांगलचं गाजत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होतांना दिसत आहेत. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाशिकमधून निघालेल्या किसान सभेचा मोर्चा विधानभवनावर लवकरच धडकणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते प्रवीण अलई यांनी शेतकऱ्यांच्या मोर्चामागे महाविकास आघाडीचा हात असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा..“सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच बळीचा बकरा बनवला”, रामदास कदम
नाशिकमधून काल असंख्य शेतकरी मुंबईच्या दिशेने पायी निघाले आहेत. त्यांचा हा मोर्चा विधानभवनावर लवकरच धडकणार आहे. यावर बोलतांना अलई म्हणाले की, जनतेला विचलित करणारी स्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीची सरकारे होती. त्यावेळी सर्व काही अलबेल व समृद्ध होते का? शेतमालाला अतिरिक्त भाव होता का? असा सवाल प्रवीण अलई यांनी केला तसेच शेतकरी राजा कर्ज मुक्त झाला होता ? पाण्याचे प्रश्न संपुष्टात आले होते का? असा सवाल करीत नाही तर..मग भाजप-युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच यामागचा बोलविता अन करविता धनी कोण ? असा सवाल करीत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…अनिल परब यांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा, सोमवार पर्यंत सुरक्षा दिली
प्रवीण अलाई यांनी केलेल्या टिकेला राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, भक्तांना वाटतंय भाजप सरकार आलं म्हणून संप निघायला लागले, त्यापाठीमागे पवार साहेबांचा हात आहे. संप आधीही निघायचे ते व्यवस्थित पणे हातळण्याचं काम आधीच्या सरकारनी केलं. आताच्या सरकारमध्ये शिंदेचा विश्वास फडणविसावर नाही आणि फडणवीसांचा विश्वास शिंदेवर नाही मग मोर्चेकऱी कसा विश्वास ठेवतील. असा सवालही सुरज चव्हाण यांनी केला आहे.
भक्तांना वाटतंय भाजप सरकार आलं म्हणून संप निघायला लागले त्यापाठीमागे पवार साहेबांचा हात आहे.संप आधीही निघायचे ते व्यवस्थित पणे हातळण्याचं काम आधीच्या सरकारनी केलं.आताच्या सरकारमध्ये शिंदेचा विश्वास फडणविसावर नाही आणि फडणवीसांचा विश्वास शिंदेवर नाही मग मोर्चेकऱी कसा विश्वास ठेवतील
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) March 14, 2023
जनतेला विचलित करणारी स्थिति..
राज्यात #राष्ट्रवादी–#कॉंग्रेस आणि #महाविकासआघाडी ची सरकारे होती,त्यावेळी सर्व काही अलबेल व समृद्ध होते का?शेतमालाला अतिरिक्त भाव होता का?यामागचा बोलविता अन करविता धनी कोण?#विचारतोयमहाराष्ट्र @NCPspeaks @INCMaharashtra@Dev_Fadnavis
१/२— Pravin Alai (प्रविण अलई) (@PravinAlai) March 14, 2023
Read also
- हेही वाचा..“राज्यात मुका घ्या, मुका घ्या, सिनेमा सुरू, दादा कोंडके हवे होते, तरूणांना अटक कराल तर याद राखा,” संजय राऊत
- हेही वाचा…राष्ट्रवादीच्या पवारांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, भाजपने केला मोठा गट काबीज
- हेही वाचा…आदित्य ठाकरेंची आंतरराष्ट्रीय भरारी…! आदित्य ठाकरेंना २०२३ चा ‘यंग ग्लोबल लीडर अवार्ड’ जाहीर
- हेही वाचा…“मग फडणवीस-मिंधे सरकार याबाबत आट्यापाट्या का खेळत आहे?” संपाबाबत उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
- हेही वाचा..जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केलेल्या संपात तांबे पित्रा-पुत्राचा सहभाग , जनतेचे प्रचंड हाल