मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांना साई रिसोर्ट प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून दाखल केलेला गुन्हा खेड न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण सरंक्षण कायद्या अतंर्गत हा गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच साई रिसोर्टचा माझा काहीही संबंध नाही. याबद्दल मी वेळोवेळी माझी भूमिका मांडली होती. असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. त्यावर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आंतरराष्ट्रीय नजर, केनियाच्या सरन्यायाधीश कोर्टात हजर
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसोर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप करीत होते. मात्र आता न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. प्रदूषण नियंत्रण विभाग, पोलीस, प्रांत, आयुक्त असतील या सर्वांनी रिसोर्टचा पाणी समुद्रात जात नाही असे रिपोर्ट दिले होते. खेड कोर्टात हे प्रकरण निकाली निघालं आहे. त्यावर उच्च न्यायालयाने सोमवार पर्यंत सुरक्षा दिली असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“गोखले यांना अटक करणारी ईडी विक्रांत घोटाळ्यात चुप राहिली” राऊतांचा सोमय्या,फडणवीसांवर निशाणा
आतमध्येच टाकायचं असतं, तर मी ई़डीला सांगितलं असतं की अनिल परबला आधी आत टाका. सदानंद कदमचा इथे काय संबंध येतो? मी आधीही सांगितलं की अनिल परबनीच सदानंद कदमला फसवलं आहे. लाईटचं बिलही अनिल परब यांच्या नावावर आहे. सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच बळीचा बकरा बनवलं आहे. सदानंद कदम यांचा काहीही संबंध नसेल, तर नक्कीच ते बाहेर पडतील. यात अनिल परबचीच सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. असंही रामदास कदम म्हणाले.
Read also
- हेही वाचा…अनिल परब यांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा, सोमवार पर्यंत सुरक्षा दिली
- हेही वाचा…शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक भाजपच्या गळ्याला, फडणवीसांच्या उपस्थित भाजपमध्ये पक्षप्रवेश
- हेही वाचा…“रखरत्या उन्हातून चालत आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर,” अजित पवारांनी मुद्दा उचलला
- हेही वाचा..एकनाथ शिंदेंच्या दोन्ही वकिलांच्या युक्तिवादात विसंगती, कोर्टाने वकिलांना सुनावलं
- हेही वाचा..“कुणाला वॉशिंग मशिनमध्ये उडी मारायची असेल, तर…” भुषण देसाईंच्या पक्ष प्रवेशावर आदित्य ठाकरेंची खोचक टिका