मुंबई : जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, महापालिका, शिक्षक संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत संपाला सुरूवात केल्यावर जनतेचे हाल सुरू झाले असून बहुतांश शासकीय सेवा ठप्प झाल्या आहेत. काही महापालिकांमध्ये अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कामकाज सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरु असले तरी जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अनुदानित शाळा-महाविद्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आणि अनेक शासकीय रुग्णालयांमधील आंतररुग्ण सेवेचाही बोजवारा उडाला आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..एकनाथ शिंदेंच्या दोन्ही वकिलांच्या युक्तिवादात विसंगती, कोर्टाने वकिलांना सुनावलं
उद्धव ठाकरे म्हणाले की, जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारला टाळे ठोकले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? मुख्य म्हणजे इतकी मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी. सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे. देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. मग फडणवीस-मिंधे सरकार याबाबत आट्यापाट्या का खेळत आहे? जे हक्काचे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे.
हेही वाचा..“कुणाला वॉशिंग मशिनमध्ये उडी मारायची असेल, तर…” भुषण देसाईंच्या पक्ष प्रवेशावर आदित्य ठाकरेंची खोचक टिका
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेच्या कामावर बहिष्कार टाकून मुंबईत आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार सुधीर तांबे यांनी संगमनेरमध्ये आंदोलनात भाग घेतला आहे.
Read also
- हेही वाचा..जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केलेल्या संपात तांबे पित्रा-पुत्राचा सहभाग , जनतेचे प्रचंड हाल
- हेही वाचा..“सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच बळीचा बकरा बनवला”, रामदास कदम
- हेही वाचा…अनिल परब यांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा, सोमवार पर्यंत सुरक्षा दिली
- हेही वाचा…शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक भाजपच्या गळ्याला, फडणवीसांच्या उपस्थित भाजपमध्ये पक्षप्रवेश
- हेही वाचा…“रखरत्या उन्हातून चालत आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर,” अजित पवारांनी मुद्दा उचलला