मुंबई : निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला बहाल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची पक्ष प्रवेशासाठी रांग लागली. याचा मोठा फटका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसला. एका बाजूला शिंदे गटात कार्यकर्त्यांची रेलचेल वाढली तर दुसऱ्या बाजूला भाजपमध्येही इतर पक्षातील नेते मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करीत आहेत. यातच काल काॅंग्रेस राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह ७00 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा…शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक भाजपच्या गळ्याला, फडणवीसांच्या उपस्थित भाजपमध्ये पक्षप्रवेश
काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये वाशिममधील काॅंग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख, नाशिकचे राष्ट्रवादीचे माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार, शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांच्यासह कोल्हापुरचे माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर यांचे बंधू बाळासाहेब कुपेकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“रखरत्या उन्हातून चालत आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर,” अजित पवारांनी मुद्दा उचलला
जनतेशी नाते असणारे हे नेते कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांचे स्वागत केले. ते पुढे म्हणाले की, गरीबांचा मसिहा कोणी असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, या देशात परिवर्तन करायचे असेल तर ते नरेंद्रजी मोदीच करू शकतील. प्रामाणिकतेने कोणी राज्य कारभार करू शकतील तर ते मोदीजी आहेत, सर्व समाज घटकांना एकत्रितपणे कोणी पुढे घेऊन जाणारे कोणी असेल तर ते मोदीजी आहेत, हा विश्वास देशातील जनतेच्या मनात आहे. म्हणून संपूर्ण समाज आपल्या सोबत येत आहे. या सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या कल्याणाकरता आपल्याला काम करायचे आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकला, असे कोणालाही वाटणार नाही.
Read also
- हेही वाचा…आदित्य ठाकरेंची आंतरराष्ट्रीय भरारी…! आदित्य ठाकरेंना २०२३ चा ‘यंग ग्लोबल लीडर अवार्ड’ जाहीर
- हेही वाचा…“मग फडणवीस-मिंधे सरकार याबाबत आट्यापाट्या का खेळत आहे?” संपाबाबत उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
- हेही वाचा..जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केलेल्या संपात तांबे पित्रा-पुत्राचा सहभाग , जनतेचे प्रचंड हाल
- हेही वाचा..“सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच बळीचा बकरा बनवला”, रामदास कदम
- हेही वाचा…अनिल परब यांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा, सोमवार पर्यंत सुरक्षा दिली