मुंबई : आठ लक्षवेधींपैकी सात लक्षवेधीदरम्यान संबंधित खात्याचे मंत्री गैरहजर विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना कामकाजाच्या नियमित वेळेत येणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. ही गोष्ट राज्याच्या गतिमान सरकारच्या मंत्र्यांना मात्र मान्य नाही असे दिसते. काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सभागृहाच्या विशेष बैठकीत लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नसल्याची बाब विधानसभा अध्यक्षांच्या लक्षात आणून दिली. त्यावर अध्यक्षांनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्ट करत मंत्र्यांना सभागृहात वेळेत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंची आंतरराष्ट्रीय भरारी…! आदित्य ठाकरेंना २०२३ चा ‘यंग ग्लोबल लीडर अवार्ड’ जाहीर
मात्र गतिमान सरकारचे मंत्रिमंडळ किती सुस्त आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. आजच्या विशेष बैठकीतही आठ लक्षवेधींपैकी सात लक्षवेधीदरम्यान संबंधित खात्यांचे मंत्री गैरहजर राहिले. काल घडलेल्या प्रकाराची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गंभीर नोंद घेऊन संबंधित मंत्र्यांना योग्य सूचना करु, अशी हमी दिली. मात्र दुसऱ्याच दिवसाच्या विशेष बैठकीत आठ लक्षवेधींपैकी फक्त एकाच लक्षवेधीचे मंत्री उपस्थित राहिले. यामुळे मंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशाचा अवमान केलाच त्याशिवाय मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ किती गांभीर्याने घेते याची प्रचितीही दिली.
हेही वाचा…“मग फडणवीस-मिंधे सरकार याबाबत आट्यापाट्या का खेळत आहे?” संपाबाबत उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ही बाब गंभीर आहे. दिलगीरी व्यक्त करतो. काल रात्री १ वाजेपर्यंत सभागृह चालले. लक्षवेधी असेल तर सकाळी उत्तर देण्यासाठी मंत्र्यांना ब्रफिंगला वेळच मिळत नाही. मात्र आता सुधारणा करण्यात येईल. शक्यतो सर्व मंत्र्यांनी उपस्थित राहिलेच पाहिजे. असे निर्देश देण्यात येतील.
Read also
- हेही वाचा…“तीन वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत राज्यपालांनी कसा मोडला?”, कोर्टात वारे फिरले, न्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी
- हेही वाचा…“..तर त्यातून सहानुभूतीची लाट निर्माण होईल,” महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उज्वल निकम यांचं मोठं विधान
- हेही वाचा.“भक्तांना वाटतंय भाजप सरकार आलं म्हणून संप निघायला लागलेत”, राष्ट्रवादीची भाजपवर टिका
- हेही वाचा..“राज्यात मुका घ्या, मुका घ्या, सिनेमा सुरू, दादा कोंडके हवे होते, तरूणांना अटक कराल तर याद राखा,” संजय राऊत
- हेही वाचा…राष्ट्रवादीच्या पवारांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, भाजपने केला मोठा गट काबीज