मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज दुसऱ्यांदा सलग सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. काल सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून वकिल हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर आज ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करणार असून त्यांचा आज शेवटचा युक्तिवाद असणार आहे. त्यामुळे ते नेमकी काय युक्तिवाद मांडणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा..जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केलेल्या संपात तांबे पित्रा-पुत्राचा सहभाग , जनतेचे प्रचंड हाल
काल शिंदे गटाच्या वकिलांनी मांडलेल्या अनेक युक्तिवाद महत्वाचे होते. ज्यावेळी १६ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यापासून सत्तासंघर्षाची लढाई सुरू झाली. आम्हाला अपात्रतेवर उत्तर देण्यासाठी फक्त ४८ तासाची वेळ दिली होती. परंतु संविधानानुसार 7 दिवसाची मुदत मिळायला हवी. १६ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात यावर स्थगिती द्यावी तसेच उपाध्यक्षांवर त्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. त्यांना मुदत वाढवून दिली होती. त्यात तेव्हा असं घडलं नाही. तेव्हा स्वायत्त संस्थाचा मार्ग रोखण्याकरीता शिंदे कडून नवी खेळी करण्यात आली होती. असा आपल्याला आरोप करता येत नाही. असं वकिल उज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच बळीचा बकरा बनवला”, रामदास कदम
राजकारणामध्ये कोण कोणती खेळी करेल, याला फार महत्व आहे. जर प्यादी सरकवली गेली नाही. तर वजीर घोड्याला मारतो, घोडा वजीरला मारतो. म्हणून असा एक बुद्धिबळाचा खेळ आहे. त्यामुळे प्रत्येक चाल महत्वाची असते. कोर्टात भावनिक युक्तिवाद केला जातो. त्याला कायद्यात जरी महत्व नसलं तरी जनमाणसामध्ये त्याचे तरगं उमटत असतात. त्यातून सहानभूतीची लाट देखील निघू शकते. त्यामुळे वकिल वेगवेगळे युक्तिवाद मांडत असतात.
Read also
- हेही वाचा.“भक्तांना वाटतंय भाजप सरकार आलं म्हणून संप निघायला लागलेत”, राष्ट्रवादीची भाजपवर टिका
- हेही वाचा..“राज्यात मुका घ्या, मुका घ्या, सिनेमा सुरू, दादा कोंडके हवे होते, तरूणांना अटक कराल तर याद राखा,” संजय राऊत
- हेही वाचा…राष्ट्रवादीच्या पवारांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, भाजपने केला मोठा गट काबीज
- हेही वाचा…आदित्य ठाकरेंची आंतरराष्ट्रीय भरारी…! आदित्य ठाकरेंना २०२३ चा ‘यंग ग्लोबल लीडर अवार्ड’ जाहीर
- हेही वाचा…“मग फडणवीस-मिंधे सरकार याबाबत आट्यापाट्या का खेळत आहे?” संपाबाबत उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल