मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज दुसऱ्यांदा सलग सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. काल सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून वकिल हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर आज ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करणार असून त्यांचा आज शेवटचा युक्तिवाद असणार आहे. त्यामुळे ते नेमकी काय युक्तिवाद मांडणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. तर आज राज्यपालाचे वकिल तुषार मेहता यांनी देखील जोरदार युक्तिवाद केला.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या पवारांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, भाजपने केला मोठा गट काबीज
सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांची बाजू वकिल तुषार मेहता यांनी मांडली. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यपालांना दिलेली वस्तुनिष्ठ सामग्री आहे. राज्यपाल दहावी अनुसूची आणि त्यामुळे निर्माण होणार्या परिणामांशी संबंध नाही. राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगण्याऐवजी अविश्वास प्रस्ताव आणण्याची आवश्यकता होती? राज्यपालांना फ्लोअर बोलावण्याचा अधिकार सरकार स्थापन होण्यापुर्वीच असतो. शिवराजसिंह चौहान केसमध्ये आले आहे. तो चांगला कायदा आहे. राज्यपालांनी पक्षाच्या प्रमुखांना नाही तर एकनाथ शिंदे यांना का आमंत्रित केले. असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी म्हटलं आहे. त्यावर न्यायालयाने महत्वाची टिप्पणी केली आहे.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंची आंतरराष्ट्रीय भरारी…! आदित्य ठाकरेंना २०२३ चा ‘यंग ग्लोबल लीडर अवार्ड’ जाहीर
राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं असं दिसून येतं. सरकार पडेल असं कोणतंही कृत राज्यपालांनी करायला नको हवं होतं. चार मुद्यांपैकी एकच मुद्दा योग्य वाटतो तो म्हणजे, 34 आमदारांनी गटनेत्याची केलेली निवड. राज्यपालांचं अस करणं लोकशाहीसाठी घातक आहे. महाराष्ट्र राज्य हे सुसंस्कृत असून अशा घटनांमुळे महाराष्ट्राला कलंक लागण्याची शक्यता आहे. अधिवेशन पुढे असतांनाही राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलवलं असं दिसून येतं. अशी महत्वाची टिप्पणी सरन्यायाधीश धंनजय चंद्रचुड यांनी दिली आहे.
Read also
- हेही वाचा…सभागृहात मंत्र्यांची अनुपस्थिती, अजित पवार संतापले, फडणवीसांनी दिलं उत्तर, सभागृहात एकच शांतता
- हेही वाचा…“तीन वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत राज्यपालांनी कसा मोडला?”, कोर्टात वारे फिरले, न्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी
- हेही वाचा…“..तर त्यातून सहानुभूतीची लाट निर्माण होईल,” महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उज्वल निकम यांचं मोठं विधान
- हेही वाचा.“भक्तांना वाटतंय भाजप सरकार आलं म्हणून संप निघायला लागलेत”, राष्ट्रवादीची भाजपवर टिका
- हेही वाचा..“राज्यात मुका घ्या, मुका घ्या, सिनेमा सुरू, दादा कोंडके हवे होते, तरूणांना अटक कराल तर याद राखा,” संजय राऊत