मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज दुसऱ्यांदा सलग सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. काल सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून वकिल हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर आज ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करणार असून त्यांचा आज शेवटचा युक्तिवाद असणार आहे. यातच कपिल सिब्बल यांनी केलेल्या एका युक्तिवादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“..तर त्यातून सहानुभूतीची लाट निर्माण होईल,” महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उज्वल निकम यांचं मोठं विधान
जेव्हा आमदार निवडून येतो तेव्हा तो पक्षाच्या तिकिटावर निवडून येतो आणि रिटर्निंग ऑफिसर त्यांना पत्र देतात की ते एका विशिष्ठ राजकीय पक्षातून निवडून आले आहेत. आमदाराची सबागृहातील ओळख म्हणजे त्यांचा राजकीय पक्ष आणि त्याशिवाय दुसरे काहीच नाही. सभापती, राज्यपाल केवळ राजकीय पक्षाला मान्यता देतात. आमदाराला राजकीय पक्षाशिवाय दुसरी ओळख नाही.
हेही वाचा.“भक्तांना वाटतंय भाजप सरकार आलं म्हणून संप निघायला लागलेत”, राष्ट्रवादीची भाजपवर टिका
राज्यपाल राजकीय पक्षाशिवाय इतर कोणालाही मान्यता देऊ शकत नाहीत. राज्यपाल व्यक्तींना मान्यता देऊ शकत नाही. समजा उद्या वेगवेगळ्या पक्षातील काही आमदार बाहेर पडले आणि म्हणाले की आमचे बहुमत आहे. अशावेळी राज्यपाल त्या आमदारांना बहुमत सिद्ध करण्याची परवानगी देऊ शकतील का ? असं केलं तर मोठा गोंधळ निर्माण होईल. राजकीय पक्षच सभागृहात व्हिपची नियुक्ती करतात. आसाममध्ये भाजपच्या मांडीवर बसून गोगावले यांना व्हीप म्हणून नियुक्त करता येणार नाही. ४ जुलैपर्यंत सुनील प्रभू हे विधानसबेत कागदावर व्हीप होते आणि त्यांना मान्यताही मिळाली होती. असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“राज्यात मुका घ्या, मुका घ्या, सिनेमा सुरू, दादा कोंडके हवे होते, तरूणांना अटक कराल तर याद राखा,” संजय राऊत
एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करून चौधरी यांची विधीमंडळ पक्षातर्फे नियुक्ती करण्यात आली आणि उपसभापतींनी त्यांना मान्यता दिल. मग एकनाथ शिंदे कोण आहेत? असा सवालही त्यांनी केला. तसेच ३४ जण कशाच्या आधारावर शिवसेना आहेत असे कसे म्हणताहेत? शिवसेनेला ४ जुलै रोजीही निवडणुक आयोगाने मान्यता दिली होती. उद्या कोणीही उठेल आणि म्हणेल मी शिवसेना आहे. असं होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयासमोर ३४ जण म्हणाले की शिवसेना आहेत पण निवडणुक आयोगासमोर ते म्हणाले की आम्ही एक गट आहोत. कारण जर ते शिवसेना असतील तर त्यांना निवडणुक आयोगात जाण्याची काय गरज आहे. ? असा सवालही कपिल सिब्बल यांनी केला आहे.
Read also
- हेही वाचा…जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, फडणवीसांनी मांडली आपली भूमिका, घेतला ‘हा’ निर्णय
- हेही वाचा.“शीतल म्हात्रे बहिणीसमान, मला आणि माझ्या कुटुंबीयाला प्रचंड मानसिक त्रास झाला,” सुर्वेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं”, 4 पैकी एकच मुद्दा योग्य, न्यायाधीशांची मोठी टिप्पणी
- हेही वाचा…सभागृहात मंत्र्यांची अनुपस्थिती, अजित पवार संतापले, फडणवीसांनी दिलं उत्तर, सभागृहात एकच शांतता
- हेही वाचा…“तीन वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत राज्यपालांनी कसा मोडला?”, कोर्टात वारे फिरले, न्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी