मुंबई : आंबाबाईच्या आशीर्वादाने पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काॅंग्रेसचा झाला तर संपुर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईल, असा नवस राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला. त्यामुळे त्यांच्यावर सध्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेने महाविकास आघाडीतील तिन्हीं पक्षांवर जोरदार टिका केली आहे.
भाजपने वाढविली शिवसेनेची डोकेदुखी; महाडिकांना विजयासाठी लागणाऱ्या १० मतांची झाली तडजोड
पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणताहेत. तर पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होऊ दे ,नवस फेडणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मग काँग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार ? असा खोचक सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे. त्यामुळे यावर आता शिवसेना , राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसकडून कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात. ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून तिसरा उमेदवार काढून घेणार ; जयंत पाटील
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विधानावरून भविष्यात त्यांना सेनेचा मुख्यमंत्री नको असे चित्र दिसतंय. गजानन किर्तीकर, खासदार संजय जाधव, श्रीकांत शिंदे व इतर सेना नेते राष्ट्रवादीबद्दल उघड नाराजी बोलून दाखवू लागले आहेत. लाचार संजय राऊत तरी राष्ट्रवादीची तळी उचलण्यात मग्न आहेत. अशी टिका देखील त्यांनी केली आहे.
“निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी देखील कित्येक वेळा पुढील 25 वर्ष हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार असल्याचं वक्तव्य केली आहेत. तसेच काल सुप्रिया सुळे यांनी देखील पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होण्यासाठी तुळजापुर येथे तुळजाभवानीकडे साकडं घातलं आहे. त्यावरून आता विरोधी पक्ष याबाबत जोरदार टिका टिप्पणी करताना दिसत आहेत.
Read also:
- पेडणेकरांचा लुडो खेळताना फोटो व्हायरल; निलेश राणे म्हणाले, ”मुंबईकरांनो तुमचे प्रश्न आता..;”
- “शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले की केंद्र सरकारला ते पहावत नाही”; शरद पवार
- आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; काॅंग्रेस शिर्डीतील अधिवेशनात राजकीय बॉम्ब फोडणार
- अन् केंद्रीय मंत्र्यांनीच स्वत: च्या मुलाचा केला सत्कार; भावुक होऊन व्यासपीठावरच ढसाढसा रडले
- आघाडी अन् इतर अपक्ष सदस्यांची मतांचा हिशोब केला तर..; प्रफुल पटेलांनी सांगितलं विजयाचं सुत्र