मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आज पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी अर्ज सादर केला आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपला 2 जागांवर विजय निश्चित असताना तिसरा उमेदवार देऊन भाजपने मोठी खेळी केली आहे. तसेच महाविकास आघाडीने अगोदर राजकीय घोडेबाजार थांबवयाला हवा होता , असा घणाघात देखील राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केला आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“घसा ओरडुन पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने सामान्य जनता नाराज”
देशात तसेच राज्यात लोकशाही असून याठिकाणी प्रत्येकाला निवडणुक लढण्याचा अधिकार आहे. परंतु महाराष्ट्रात कुणी घोडेबाजार करून निवडणुक लढणार असेल तर त्यावर आमचं बारीक लक्ष आहे. त्यामुळे कुणीही घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आम्हाला देखील पुर्ण खात्री आहे की, शिवसेनेला जेवढी मतांची गरज आहे. तेवढी मत मिळणार आहेत. अशी आशा देखील राऊतांनी व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिकेवर कमळ फुलणार; सट्टा बाजारात भाजपला सर्वात पसंती
आमच्या गृह खात्याचं आणि मुख्यमंत्र्यांच या निवडणुकीकडे बारीक लक्ष आहे. त्यामुळे निवडणुक झाली तर स्वागत आहे. नाही झाली तर डबल स्वागत आहे. असा इशाराही राऊतांनी दिला आहे. काॅंग्रेसबाबत बोलताना ते म्हणाले की, काॅंग्रेसची परिस्थिती सध्या बिकट आहे. ती पाहता ते खुप कमी लोकांना राज्यसभेवर पाठवू शकतात. त्यांनी उत्तर प्रदेशचे इम्रान प्रतापगढ़ी यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही स्थानिक नेत्या ला उमेदवारी दिली असती तर अजून काॅंग्रेसला बळकटी आली असती, असंही ते म्हणाले.
“मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलल्यानंतर काही लोकांवर का आभाळ कोसळ्यासारखं झालं”?
दरम्यान, भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे, आणि धनंजय महाडिक यांना तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांनी आज उमेदवारी अर्ज सादर केला. तसेच शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Read also:
- “काॅंग्रेसकडून प्रतापगढ़ींना राज्यसभेची उमेदवारी जाहीर”; पटोले म्हणाले, “कोणीही नाराज नाही”
- राज्यसभेसाठी भाजपने तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिकांची निवड का केली?.. वाचा सविस्तर..
- ‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
- “मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”
- आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा