मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजपच्या राजकीय नेत्यांवर जोरदार टिका केली असून मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम”; शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
दिपाली सय्यद यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी भाजपच्या काही नेत्यांची नावे घेतली आहे. यात त्या म्हणाल्या की, हे सर्व महाराष्ट्राची बदनामी करण्याकरीता घडवले जात आहे. अंस म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांची बायको उठ सुट मुख्यमंत्री पदावर टीका करते . त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्वोच्च पदाचा तुम्हाला विसर पडतो का ? असा सवाल केला आहे.
“साई रिसॉर्टशी काहीही संबंध नाही, मग हा रिसॉर्ट कुणाचा”? सोमय्यांचा अनिल परबांना सवाल
किरीट सोमय्या यांनी आरोप व तक्रार केलेले अनेक मंत्री आता भाजप मध्ये आमदार, मंत्री झाले आहेत. त्यांच्या विरोधात कधी बोलला नाही पण मुख्यमंत्री पदावर नेहमी खालच्या भाषेत टीका करतो. नवनीत राणा एक अपक्ष खासदार जी फक्त महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याकरीता मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबावर बोलते, तथ्य नसलेले आरोप करते. व यासर्व बाबींनी भाजप नेते समर्थन देण्यासाठी एकत्र येतात.
“मुख्यमंत्र्यांनी मान राखला नाही, असं बोलणं चुकीचं”; शाहु महाराजांचं गोप्यस्फोट
दरम्यान, अतुल भातखळकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील इत्यादी भाजप नेते मुख्यमंत्री पदावर खालच्या भाषेत टिका करतात. पण या सर्वांना मी एवढच सांगेन जसे तुम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यापेक्षा आम्हाला जास्त उद्धव ठाकरे आहेत. सुरवात तुम्ही केलीत तर शेवट आम्ही करु. मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
@ShivSena @CMOMaharashtra pic.twitter.com/pk0FytljI5
— Deepali Sayed (@deepalisayed) May 30, 2022
Read also:
- आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा
- “घसा ओरडुन पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने सामान्य जनता नाराज”
- मुंबई महापालिकेवर कमळ फुलणार; सट्टा बाजारात भाजपला सर्वात पसंती
- “मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलल्यानंतर काही लोकांवर का आभाळ कोसळ्यासारखं झालं”?
- लोकसभेच्या निवडणुकीत MIM अन् वंचितने भाजपकडून 1 हजार कोटी रूपये घेतले; चंद्रकांत खैरे