मुंबई : राज्यसभेसाठी काॅंग्रेसने उत्तर प्रदेशचे नेते इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परराज्यातील नेत्याला राज्यसभेसाठी संधी दिल्यानंतर काॅंग्रेसमध्ये नाराजी असल्याचं सुर दिसायला लागले. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अशातच आता काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर बोलताना कोणताही नेता नाराज नसल्याचं म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेवर कमळ फुलणार; सट्टा बाजारात भाजपला सर्वात पसंती
महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढ़ी यांना उमेदवारी दिल्यानंतर अनेकांनी नाराजी आणि टिका केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधील आहेत तरी त्यांनी वाराणसीमधून निवडणुक लढवली आहे. त्यांच्यासाठी हा परराज्यातील निवडणुकीसाठी नियम लागू होत नाही. लोकसभा अथवा राज्यसभा असल्याने ते देशाचे नेतृत्व करत असताना त्यांना कोणतंही बंधन नसतं. दिल्ली हायकमांडने आम्हाला एक युवा नेतृत्व दिलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्यामुळे काॅंग्रेसमध्ये कोणताही वाद महाराष्ट्रात नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
“मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलल्यानंतर काही लोकांवर का आभाळ कोसळ्यासारखं झालं”?
इम्रान प्रतापगढ़ी यांना उमेदवारी दिल्यानंतर राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीचं सुरू पहायला मिळाले. मात्र अजूनही कोणत्याही नेत्यांनी आपली नाराजी जाहीर पणे प्रकट केली नाही. असं असलं तरी अनेकदा काॅंग्रेसने महाराष्ट्रातून परराज्यातील नेत्याला राज्यसभेवर पाठवलं आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत MIM अन् वंचितने भाजपकडून 1 हजार कोटी रूपये घेतले; चंद्रकांत खैरे
दरम्यान, राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरस बघायला मिळण्याची शक्यता आहे कारण एकुण 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात उतरले असून प्रत्येक उमेदवाराला 42 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला या 42 मतांसाठी गणित मांडण्यात अडचण येणार हे मात्र नक्की आहे.
Read also:
- राज्यसभेसाठी भाजपने तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिकांची निवड का केली?.. वाचा सविस्तर..
- ‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
- “मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”
- आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा
- “घसा ओरडुन पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने सामान्य जनता नाराज”