अहमदनगर : महाविकास आघाडीमध्ये काॅंग्रेस पक्षाची धुसफुस कायम आहे. विकास निधी, भंडारा- गोंदिया स्थानिक स्वराज्य पक्षाच्या निवडणुकांवरून काॅंग्रेसने आघाडी सरकारवर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता काॅंग्रेसचा 1 ते 2 जून रोजी राष्ट्रीय मेळावा होत आहे. त्या मेळाव्यात काॅंग्रेस आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. कारण आघाडीतील ज्या काही गोष्टी घडल्या आहेत. त्याबाबत देखील काॅंग्रेस बोलण्याची शक्यता आहे.
“काॅंग्रेसकडून प्रतापगढ़ींना राज्यसभेची उमेदवारी जाहीर”; पटोले म्हणाले, “कोणीही नाराज नाही”
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीबाबत प्रखरपणे वक्तव्य केले आहेत. आमदारांना निधी न मिळणे, सरकारमध्ये दुय्यम वागणुक मिळणे अशा अनेक तक्रारी नाना पटोले यांनी हायकमांडकडे केल्या आहेत. त्यामुळे शिर्डीतील अधिवेशानात या सगळ्या गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. तसेच काॅंग्रेस पुढील निवडणुकांबाबत देखील आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
राज्यसभेसाठी भाजपने तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिकांची निवड का केली?.. वाचा सविस्तर..
शिर्डीतील अधिवेशनानंतर काॅंग्रेसच्या काही मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मिळणारी दुय्यम वागणुक याबाबत चर्चा करण्याचा अंदाज आहे. तसेच महाविकास आघाडीसोबत पुढील निवडणुकां लढायाच्या की स्वंतत्र याबाबतही निर्णय घेतील.
‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
दरम्यान, सध्या काॅंग्रेस पक्षाला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काॅंग्रेस पक्षाची चिंता राज्यातील अनेक नेत्यांना लागून आहे. अशातच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काॅंग्रेसने उत्तर प्रदेशचे इम्रान प्रतापगढ़ी यांची निवड केली आहे. त्यावर देखील राज्यातील काही काॅंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र कोणताही नेता यावर नाराज नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं.
Read also:
- “त्यामुळेच भाजपच्या लिंबु टिंबुना वाईट वाटलं, तरीही त्याला शिवसेना भिक घालणार नाही”
- आघाडी अन् इतर अपक्ष सदस्यांची मतांचा हिशोब केला तर..; प्रफुल पटेलांनी सांगितलं विजयाचं सुत्र
- भाजपने वाढविली शिवसेनेची डोकेदुखी; महाडिकांना विजयासाठी लागणाऱ्या १० मतांची झाली तडजोड
- भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून तिसरा उमेदवार काढून घेणार ; जयंत पाटील
- “निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य