मुंबई : महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची मते आणि महाविकास आघाडी सरकारला मानणाऱ्या इतर अपक्ष सदस्यांची मते यांचा हिशोब केला तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही, असे मत प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. त्यांनी आज राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर केला. यावेळी महाविकास आघाडीतील नेते देखील उपस्थित होते.
‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
गेली ३२ वर्षे महाराष्ट्रातील जनतेच्या आणि पक्षातील नेत्यांच्या आशीर्वादानेच मी राजकारणात सतत कार्यरत आहे. यातून देशाच्या आणि राज्याच्या हिताची कामे करण्याची संधी मला मिळाली, महाविकास आघाडीतील आमदारांना आपले मत देताना ते मत आपल्या पक्ष प्रतोदांना दाखवून करावे लागेल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे चारही उमेदवार निवडून येतील, याची खात्री असल्याचे प्रफुल पटेल म्हणाले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मित्र पक्षांचे आमदार व अपक्ष आमदारांशी चर्चा केल्यानंतरच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार दिलेला आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
“मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. आमचे तिन्हींही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आमचे तीन त्यांचे तीन तसेच त्यांनी एक उमेदवार परत मागे घेतला पाहिजे. मग घोडेबाजारांचा प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु जरी त्यांनी तो उमेदवार ठेवला तरी आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्यासाठी आणि मागे घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदमध्ये घोडेबाजार करणे भाजपला देखील पसंत पडणार नाही. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त भरलेला उमेदवार काढून घेण्याचा देखील ते विचार करणार. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर यावर आता आपल्याला भाष्य़ करता येईल, असं मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
Read also:
- भाजपने वाढविली शिवसेनेची डोकेदुखी; महाडिकांना विजयासाठी लागणाऱ्या १० मतांची झाली तडजोड
- भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून तिसरा उमेदवार काढून घेणार ; जयंत पाटील
- “निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य
- “काॅंग्रेसकडून प्रतापगढ़ींना राज्यसभेची उमेदवारी जाहीर”; पटोले म्हणाले, “कोणीही नाराज नाही”
- राज्यसभेसाठी भाजपने तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिकांची निवड का केली?.. वाचा सविस्तर..