मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्यासाठी आणि मागे घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदमध्ये घोडेबाजार करणे भाजपला देखील पसंत पडणार नाही. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त भरलेला उमेदवार काढून घेण्याचा देखील ते विचार करणार. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर यावर आता आपल्याला भाष्य़ करता येईल, असं मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. आमचे तिन्हींही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आमचे तीन त्यांचे तीन तसेच त्यांनी एक उमेदवार परत मागे घेतला पाहिजे. मग घोडेबाजारांचा प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु जरी त्यांनी तो उमेदवार ठेवला तरी आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
“घसा ओरडुन पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने सामान्य जनता नाराज”
देशात तसेच राज्यात लोकशाही असून याठिकाणी प्रत्येकाला निवडणुक लढण्याचा अधिकार आहे. परंतु महाराष्ट्रात कुणी घोडेबाजार करून निवडणुक लढणार असेल तर त्यावर आमचं बारीक लक्ष आहे. त्यामुळे कुणीही घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आम्हाला देखील पुर्ण खात्री आहे की, शिवसेनेला जेवढी मतांची गरज आहे. तेवढी मत मिळणार आहेत. अशी आशा देखील राऊतांनी व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिकेवर कमळ फुलणार; सट्टा बाजारात भाजपला सर्वात पसंती
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. तर काॅंग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांच्या नावाची चर्चा आहे. यासाठी येत्या १० जून रोजी मतदान होत असून अर्ज सादर करण्याची शेवटची ३१ मे शेवटची तारीख आहे.
Read also:
- “निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य
- “काॅंग्रेसकडून प्रतापगढ़ींना राज्यसभेची उमेदवारी जाहीर”; पटोले म्हणाले, “कोणीही नाराज नाही”
- राज्यसभेसाठी भाजपने तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिकांची निवड का केली?.. वाचा सविस्तर..
- ‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
- “मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”