अहमदनगर : पुर्वी केंद्र सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारी मंडळी होती. आता तसे राहिले नाही. उलट शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले तर सध्याच्या केंद्र सरकारला पहावत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे येऊ लागेल की धोरणे बदलली जातात. सध्याही साखर आणि गव्हातून शेतकऱ्यांना बरे पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना या दोन्हींच्या निर्यातीवर निर्बंध आणण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
“निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य
अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथे बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावर कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ, कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रतापराव ढाकणे, आमदार निलेश लंके, संग्राम जगताप, नरेंद्र घुले उपस्थित होते. तसेच यावेळी महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे या पुस्तकाचे प्रकाशन आणि कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे भूमीपुजन करण्यात आले.
“काॅंग्रेसकडून प्रतापगढ़ींना राज्यसभेची उमेदवारी जाहीर”; पटोले म्हणाले, “कोणीही नाराज नाही”
सहकारी तत्त्वार देशातील पहिला साखर कारखाना धनंजयराव गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अहमदनगर जिल्ह्यात झाला. पूर्वी केंद्र सरकारला शेतकऱ्याविषयी जाण होती. आम्ही केंद्रात सत्तेवर असताना शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात होते. आता चुकीचे निर्णय घेतले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसाना होत आहे. बदलत्या परिस्थिमुळे उस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि कारखान्यांनी केवळ साखरेवर अवलंबून न राहत इथेनॉल, अल्कोहोल, वीज निर्मिती यांच्यावर भर देण्याची गरज आहे. त्यातून शेतकऱ्यांचाही फायदा होईल, असंही ते म्हणाले.
‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
दरम्यान, राजकारणांमुळे महाराष्ट्रभर फिरत राहिल्यामुळे मुलांबाळांकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे मित्रांचा, नातेवाईकांचा , मुलाबाळांचा तसेच नातवातांचा देखील माझ्यावर राग आहे. इतकं सर्व केलं आहे आणि आम्ही कोण आहे ? परंतु रात्रंदिवस आम्ही रस्त्यात होतो. परंतु आता माझा मुलगा प्रतापच्याही आयुष्यात तोच संघर्ष आला आहे. पंरतु तो त्याला कंटाळा नाही. त्याचा सलग तीनवेळा पराभव झाला. सत्ता महत्वाची नाही, मात्र त्यापुढचा संघर्ष त्याच्यासमोर आला. परंतु त्यांनी आज चांगलं काम केलं आहे, म्हणून माझ्या हाताने त्याचा सत्कार करणार आहे. असं माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे म्हणाले. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रतापराव ढाकणे यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि ते व्यासपीठावरच ढसाढसा रडले.
Read also:
- आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; काॅंग्रेस शिर्डीतील अधिवेशनात राजकीय बॉम्ब फोडणार
- अन् केंद्रीय मंत्र्यांनीच स्वत: च्या मुलाचा केला सत्कार; भावुक होऊन व्यासपीठावरच ढसाढसा रडले
- आघाडी अन् इतर अपक्ष सदस्यांची मतांचा हिशोब केला तर..; प्रफुल पटेलांनी सांगितलं विजयाचं सुत्र
- भाजपने वाढविली शिवसेनेची डोकेदुखी; महाडिकांना विजयासाठी लागणाऱ्या १० मतांची झाली तडजोड
- भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून तिसरा उमेदवार काढून घेणार ; जयंत पाटील