मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी आणि हिंदुत्तवाच्या मुद्यावरून आक्रमक झाले आहेत. मागील काही आठवड्यांमध्ये झालेल्या भाषणात त्यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून जोरदार ठाकरी दणके दिले आहेत.
अटकेपासून संरक्षणाची मागणी कोर्टाने फेटाळली; मुंबै बँक फसवणूक प्रकरणात प्रवीण दरेकरांचा पाय खोलात
परवा दिवशी संध्याकाळच्या सुमारास देखील मनसेने मराठीच्या मुद्यावर आक्रमक होऊन ताज हॉटेल्सच्या बाहेर बसेसची तोडफोड केली आहे. यावेळी जर पुन्हा परप्रांतीय बसेस दिसल्या तर त्याही फोडू, इथं भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे अशी मनसेची भूमिका होती. याच भूमिकेवरून आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला आहे. आयपीएल संदर्भातील स्थानिकांना काम मिळणार नसतील तर स्पर्धा मुंबईत भरवण्याचा खटाटोप का केला जातोय असा संतप्त सवाल त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
दरेकरांना अटक झाली, की ते फरार झालेत? मनिषा कांयदेचा भाजपला तिखट सवाल
महाराष्ट्रात आयपीएल झाल्यास राज्याचे अर्थचक्र फिरते असं राज्य सरकारला म्हणत असते. मात्र महाराष्ट्रात आयपीएल होत असताना भूमिपुत्रांना काम न देता परराज्यातील कंत्राटदारांना काम देण्याचे काम राज्य सरकार करते. हे असं केल्यास महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना कसा न्याय मिळणार याबाबत साशंकता आहे. शिवसेनेने आजपर्यंत कधीही भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली नाही.
मुंबै बँकेत सर्वपक्षीयांचं ठरलं! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार
सध्या जर त्यांच्याकडं पाहिलं तर ते भूमिपुत्रांना न्याय देणार आणि आम्ही भूमिपुत्रांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं देखील संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर प्रश्न हा आहे युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वतःच अर्थचक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्रच?? असा खडा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे.
मुंबै बँकेत घोटाळा: अजित पवारांच्या जवळचे ६ संचालक सामील – प्रवीण दरेकांचा दावा