मुंबई : मुंबईसाठी आताची महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. 7 मार्चला मुंबई महानगरपालिकेची मुदत संपत आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे की कोणत्याही आस्थानिक संस्थेला मुदतवाढ देता येत नाही.
‘भाजपसोबत जनशक्ती असल्याचे कांदोळकरांच्या लक्षात आल्याने आता ते धनशक्तीचा वापर करत आहेत’
प्रशासक नेमण्याचा इतर महानगरपालिका किंवा नगरपालिकांसाठीच्या कायद्यात तरतूद आहे. मुंबई महापालिकेच्या कायद्यात तशी तरतूद नाही. त्यासाठी आज मंत्रीमंडळाने निर्णय घेतलेला आहे कि कायद्या बदल करुन ७ मार्चनंतर मुंबई महानगर पालिकेवर प्रशासक नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
माझा राजकीय खुन करण्याचा प्रयत्न; मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल, राज्यपालांना हा निर्णय कळवण्यात येईल. राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर याबाबत अध्यादेश काढण्यात येईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगच्या शिफारसीनुसार हा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
Read also:
- नितेश राणेंची प्रकृती आणखी बिघडली; संध्याकाळी होणार सिटी अँजिओग्राफी
- अण्णा हजारेन बेमुदत उपोषणाच अस्त्र उगारलं; ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात उतरणार मैदानात
- सिंह कधी गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही; संजय राउतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
- अमरावतीत महापालिका आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले
- मोठी बातमी: नितेश राणेंना मोठा दिलासा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर