संपादक / मिलिंद वैद्य
पिंपरी चिंचवड : महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांत निर्नायकी कलगीतुरा रंगल्याने राज्यात संशयाचे, संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीला सर्वस्वी राजकीय नेते मंडळी कारणीभूत आहेत. रोज एखाद्या सत्ताधारी नेत्यावर, मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे, गैर कारभाराचे आरोप केले जात आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी विरोधी नेत्यांची लक्तरे वेशीवर टांगत आहेत. कोट्यवधींचे आकडे जनतेसमोर ठेऊन घोटाळ्याची प्रकरणे मांडत असताना जनतेच्या प्रश्नाचे भले काही होऊ द्यात; पण, प्रतिस्पर्धी राजकारणातून कायमचा उठला पाहिजे, अशी अहमहमिका आपापसांत सुरु आहे. त्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन हीन भाषेचा वापर केला जात आहे. हे विदारक घाणेरड्या राजकारणाचे चित्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत सारखेच आहे. कोणी सुपात तर कोणी जात्यात आहेत एवढेच ! याचा सामान्य जनतेच्या जगण्या – मरणाशी काय संबंध आहे, याचाच सत्ताधाऱ्यांना विसर पडलेला दिसतो. हे महाराष्ट्राचे दुर्दैवच !
ज्या ‘ठाकरेंनी’ तुम्हाला घडवलं त्यांच्याबद्दल बोलताना जीभ चाचरु द्या – केसरकर
सत्तेच्या राजकारणात जनतेचा विसर पडून बेधुंद झालेले राजकारणी प्रतिस्पर्ध्याला हीन ठरविण्यासाठी तोंडाला येईल ते बरळताहेत. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ती काय असणार ? राज्य सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न विरोधकच करतायेत असे नाही; तर, सत्ताधारीही त्यासाठी खतपाणी घालताहेत. जे राज्यात तेच शहरात. सरकारच्या दिरंगाईमुळे मुंबईसह राज्यातील दहा महानगर पालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लांबल्या. ज्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा देखील समावेश आहे. आता ह्या निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शहराच्या ४६ प्रभागांची फेर रचना अंतिम टप्प्यात आहे. कधी नव्हे, ते साडेपाच हजारांहून अधिक हरकती दाखल झाल्या आणि शहरातील वातावरण तापायला सुरवात झाली. निवडणुकीचे वारे वाहू लागताच कुंपणावरची मंडळी पटापट उड्या मारू लागली आहेत. त्याचा पहिला ट्रेलर काल पाहायला मिळाला.
२५ हजार कोटींचा घोटाळा करणारा अमोल काळे लंडन’ला गेला का? काँग्रेसच्या सवालाने भाजपात खळबळ
सुरवातीलाच राज्याच्या राजकीय वास्तवाची जाणीव करून द्यावी लागली याचे कारण ते राजकारण स्थानिक राजकारणावर परिणाम करणारे आहे. ते तरुणाच्या लक्षात आणून द्यायला हवे. मोशीतील भाजपचा एक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करता झाला. तरुण गडी एवढा अस्वस्थ का झाला असावा ? काय घडले असावे. याचा थोडा मागोवा घेतला तेंव्हा, आश्चर्य वाटले. ही तरुण राजकारणी मंडळी यांच्यात कष्ट, संयम, त्याग, विनम्रता, विश्वास,अभ्यास,दूरदृष्टी,तारतम्य आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे पक्ष, नेता यांच्याप्रती निष्ठा कधी पाहायला मिळणार ? हे सारं इतिहास जमा तर झाले नाही ना ? भाजपचे प्रभाग तीनचे एक तरुण नगरसेवक वसंत बोराटे यांनी आपली नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुरुवारी (ता. १७ फेब्रुवारी ) प्रवेश केला. पिंपरी चिंचवड महापालिकेत जेंव्हा मोशीचा समावेश झाला. त्यानंतर पहिल्यांदा या भागाचे प्रतिनिधित्व ज्यांनी केले ते जनता दलाचे माजी नगरसेवक बबन बोराटे यांचे वसंत बोराटे हे पुतणे. बबनरावांनी देखील नंतर राष्टवादीचे घड्याळ मनगटावर बांधले, हा इतिहास आहे. आता पक्ष सोडताना वसंत बोराटे यांनी काय करणे दिलीत ते पाहू.
शिलेदार का नाराज ?
वास्तविक, बोराटे यांची ही पहिलीच टर्म. एकेकाळचे आमदार महेश लांडगे यांचे ते विस्वासू सहकारी. त्यामुळेच त्यांना पहिल्यांदा नगरसेवक होण्याची संधी मिळाली. नुसते नगरसेवकच नाही; तर, महापालिकेच्या विधी समितिकचे सदस्यपदही त्यांना मिळाले. पंधरा वर्ष सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला २०१७ मध्ये सत्तेवरून दूर हटविण्याचा पराक्रम आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी केला. त्यातीलच वसंत बोराटे हे एक शिलेदार आहेत हे नाकारून चालणार नाही. त्यांनी इतक्या तडकाफडकी भाजप पार्टी सोडावी हे अनाकलनीय आहे असे नाही. पण, ‘ पैसे खर्च करून आपल्याला पक्षाकडून आणि महापालिकेकडून काहीच मिळाले नाही’ असा दावा करणे किती करंटेपणाचे म्हणायचे ? हल्ली काय झाले आहे की, तरुणांना ‘झट मंगनी, और पट शादी’ हावी असते. मग, त्यासाठी कष्ट उपसण्याची त्यांची तयारी नाही. १९९७ मध्ये १८ गावे महापालिकेत समाविष्ट झाली. तेंव्हापासून मोशीसह इतर समाविष्ट गावे रस्ते, वीज, पाणी या सारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित होती. विकासाची गंगा आपल्या गावापर्यंत येत नाही. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यावर सातत्याने अन्याय करते या मुद्द्यावरून २०१७ पूर्वी नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपने हा संघर्ष संपुष्टात आणून रस्ते, वीज पाणी,आरोग्य सुविधा पुरविल्या हे नाकारून चालणार नाही. अर्थात, सर्वच कामे झाली असे नाही.
हास्यास्पद दावा
आपल्या प्रभागांत अनेक विकास कामे मी केली हे स्वतः बोराटे मान्य करतात. पण, पक्षाचे वरिष्ठ नेते कामाचे श्रेय लाटतात असा हास्यास्पद दावा त्यांनी केला. अहो, कोणताही सत्ताधारी पक्षाचा नेता प्रमुख म्हणून असे श्रेय घेणारच हे राजकारणात राहून समजले नाही, तरच नवल. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने पंधरा वर्षे आपल्या गावाकडे ढुंकूनही पहिले नाही, गावचा विकास निधी इतर शहरी विभागाकडे वळविला, ते पुढे आपली कामे प्राधान्याने करतील, विकासाच्या पायघड्या घालतील असे बोराटे यांना वाटते का ? ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी हे समाविष्ट गावांतील जनतेला चांगलेच माहित आहे. त्यामुळे बोराटे यांचे हे कारण अगदीच न पटणारे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राजकारणात यायचे म्हणजे समाजसेवा नव्हे तर कमवायला यायचे असा समज सध्याच्या नव्या पिढीपुढे आहे. हा त्या पिढीचा दोष नाही; अलीकडच्या राजकारण्यांनीच तसा आदर्श या पिढी समोर ठेवला आहे.
पुण्यात शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या; उपनेता कुचिक यांच्या विरोधात लैगिंक अत्याचाराचा गुन्हा
भाजप नेतृत्वाने दखल घ्यावी बोराटे ज्या पक्षात दाखल झाले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुळीच दोष द्यायचा नाही. लोकशाहीत प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार आहे. पण एकदा पक्षात आल्यावर रथी महारथी थंड झालेले पिंपरी चिंचवडकरांनी आजवर पहिले आहे. तशी यादी द्यायचीच झाली तर अनेक मात्तबरांची नवे घ्यावी लागतील. तेंव्हा पक्षात दाखल होणाऱ्यांची आगीतून फुपाट्यात पडलो अशी गत होऊ नये. राज्यातील महाआघाडी सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार आहेच शिवाय महापालिका निवडणुकाही अनिश्चित आहेत. राजकीय समीकरणे बदलली तर तरुण उमेदवारांवर इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण होऊ शकते. दुसरीकडे भाजप नेतृत्वाने देखील असंतुष्ट नगरसेवकाची दखल घेऊन नाराजी दूर करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे हे नक्की !
Read also:
- शिवसेनेवर शोककुळा: जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास
- महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? राजू शेट्टींच राहूल गांधींना पत्र
- अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार – चंद्रकांत पाटील
- हिंदुस्थानी भाऊ’ला अखेर सशर्त जामीन मंजूर, काय आहे नेमकं प्रकरणं… वाचा सविस्तर…
- पुणे महापालिकेतील 6000 कोटींचा संशयास्पद व्यवहार; राष्ट्रवादीची एसीबीकडे तक्रार दाखल