नवी दिल्ली : पेगासस प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पेगाससचं हत्यार देशद्रोही आणि दहशतवाद्यांच्या विरोधात वापरलं जायला हवं होतं. पण हे हत्यार देशाविरोधातच वापरलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या लोकशाही आत्म्यावरच घाव घातला आहे, असा घणाघाती हल्ला राहुल गांधी यांनी चढवला आहे.
मिशन यूपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार देशभरातील ओबीसी विद्यार्थ्यांना देणार मोठा दिलासा
पार्लमेंट चेंबरमध्ये आज काँग्रेससह 14 विरोधी पक्षांची बैठक पार पडली. त्यानंतर राहुल गांधींसह या 14 पक्षांचे नेते मीडियाला सामोरे गेले. यावेळी राहुल यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशातील सर्व विरोधक एकवटले आहेत. सर्व पक्षाचे नेते आहेत. आमचा आवाज संसदेत दाबला जात आहे. आमचा केवळ एकच प्रश्न आहे. केंद्र सरकारने पेगाससची खरेदी केली की नाही. त्यांनी होय किंवा नाही या शब्दात उत्तर द्यावं. केंद्र सकारने देशातील नागरिकांची हेरगिरी केली की नाही, याचंही उत्तर होय किंवा नाही या शब्दात द्यावी. आम्हाला हे जाणूनच घ्यायचं आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
I want to know from the youth of the country – Narendra Modi Ji has sent a weapon in your phone. This weapon has been used against me, Supreme Court, many leaders, people in the press & activists. So why it should not be discussed in the House?: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/tzxLXo1lyQ
— ANI (@ANI) July 28, 2021
पेगाससवर संसदेत चर्चा होणार नाही, असं आम्हाला केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. मोदी सरकारने तुमच्या मोबाईलमध्ये एक शस्त्र टाकलं आहे. माझ्याविरोधात या हत्याराचा वापर केला गेला. सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्या हत्याराचा वापर केला. प्रेस, कार्यकर्ते आणि इतरांच्या विरोधातही या हत्याराचा वापर करण्यात आला. त्यावर संसदेत चर्चा का होत नाही? हा प्रश्न आहे. आम्ही संसदेत गोंधळ घालत आहे असा आरोप लावला जात आहे. पण आम्ही तसं करत नाही. आम्ही आमची जबाबदारी पार पडत आहोत. केवळ काँग्रेस नेता म्हणून नव्हे तर सर्वच नेते हे सांगतील, असंही ते म्हणाले.
We want to know from Narendra Modi and Amit Shah – why you used this weapon (Pegasus spyware) against India's democratic institutions?: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/86gN8fLGrl
— ANI (@ANI) July 28, 2021
दिल्लीत झालेल्या या बैठकीला काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी, शिवसेना, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) आणि व्हिसीके पार्टीचे नेते उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सरकारला यावर उत्तर द्यावच लागेल, असा इशारा दिला.
Read Also :
- “फडणवीसांनी उठसूठ बोलण्यापेक्षा अभ्यास आणि संशोधन करून बोलावं”
- आघाडी सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त, पूरग्रस्तांना सोडले वाऱ्यावर ; पडळकर यांची खोचक टीका
- दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: आरोपी जामिनावर बाहेर आले तरी वनविभागाची चौकशी संपेना
- अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र संकटात, नवी मुंबई महापालिकेने १ कोटी रुपयांची मदत करावी – आमदार मंदा म्हात्रे
- थांब रे, मध्ये बोलू नको, फडणवीसांसमोरच नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना झापले