पुणे : बारामती लोकसभेवरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात चांगलीच जुंपली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टिका करत बारामतीची जागा लढवण्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार गटानेही शिंदेंना इशारा दिला आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद पराजंपे यांनी एकनाथ शिंदे यांना इशारा दिला. तर त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी त्यावर पलटवार केलाय.
हेही वाचा…“सुळे, सुनेत्रा पवार अन् शिवतारेंसह मैदानात, बारामतीच्या रिंगणात आणखी एक ओबीसी चेहरा उतरणार
विजय शिवतारे यांनी बारामतीत अजित पवारांना पाडण्याची भाषा केल्यानंतर आनंद पराजंपे यांनी देखील कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना पाडण्याची भाषा केली होती. त्यावर देखील नरेश म्हस्के यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना योग्य ती समज दिली आहे. महायुतीच्या नेत्यांनी देखील विजय शिवतारे यांना समज दिली आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही निवडणुक जिंकण्याचा संकल्प ठेवला आहे. त्यामुळे येणारी संकटे आम्ही जाणूनच काम करत आहोत. कोणीही भांडणं वाढवण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्हाला देखील विधान करता येतं. जे काही चाललंय आहे ते नेते संपवतील. त्यामुळे कुणाची ताकद किती आहे. ते पण आम्हाला चांगलचं ठाऊक आहे. असे नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…मोठी घोषणा..! तिरंगी लढतीचा फटका अजित पवारांना बारामतीत बसणार ? विजय शिवतारे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा अपमान करतायत, पक्षाच्या शक्तिस्थळांवर आघात करत आहेत. बारामती लोकसभेची जागा अपक्ष लढणार अशी घोषणा शिवतारेंनी केलीय. शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान असल्याचा दावा करतात. यासाठी त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे खुलासा करण्याची मागणी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपचा माजी खासदार शरद पवारांकडून निवडणूक लढणार; राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा..‘अहमदनगर’ शहराचं नाव बदललं, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
हेही वाचा.*“काल मनसेला जय महाराष्ट्र, आज वसंत मोरेंना ३ मोठ्या पक्षांची ऑफर”, कोणत्या पक्षात जाणार ?*
हेही वाचा…“मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’” शिंदे अन् अजित पवारांना जोरदार टोला
हेही वाचा..“शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर विरोधकांना नक्कीच घाम फुटणार ?” कारण ही आलं समोर