मुंबई : लोकसभा निवडणुकीपुर्वी हरियाणा राज्यात भाजपसोबत जेजेपीने युती तोडली आहे. त्यामुळे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपने अपक्ष आमदारांनासोबत घेऊन पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. यातच लोकसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीत सध्या अनेक पेच निर्माण होत आहेत. यावरूनरच रोहित पवारांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..“सातारा आपलाच, कामाला लागा,” अजित पवारांनी लोकसभेसाठी कार्यकर्त्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह करणाऱ्या ‘मित्राला’ भाजपने शिकवलेला धडा हा महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी संदेश तर आहेच शिवाय अल्टिमेटम देखील आहे. हरियाणातील राजकीय घडामोड बघता विकासाच्या आणि विचारधारेच्या नावाखाली भाजपसोबत जाणाऱ्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’ याचा प्रत्यय आलाच असेल. उद्या लोकसभेसाठी राज्यात सर्वच मित्रपक्षांना कमळाच्या चिन्हावर लढावे लागले तर आश्चर्य वाटू नये. असो स्वतःच्या अडचणींमुळे नेते हतबल असले तरी तिकडे गेलेले आमदार मात्र हतबल नाहीत, ते नक्कीच योग्य तो बोध घेऊन सुयोग्य तो निर्णय लवकरच घेतील. असंही रोहित पवारांनी सांगितले.
हेही वाचा…“मी कॉंग्रेसची, अन् कॉंग्रेसच्याच तिकीटावर निवडणुक लढणार”, चंद्रपुरात कॉंग्रेसमध्येच पेच वाढला
दरम्यान, लोकसभा जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधत आहेत. परंतु जागावाटपाबाबत अद्यापही कोणताही तिढा सुटलेला नाही. यातच लोकसभेच्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढवणार असून मित्र पक्षांना कमीत कमी जागा देणार असल्याचीही माहिती समोर आलीय. यावरूनच रोहित पवारांनी टोला लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर विरोधकांना नक्कीच घाम फुटणार ?” कारण ही आलं समोर
हेही वाचा…“सुळे, सुनेत्रा पवार अन् शिवतारेंसह मैदानात, बारामतीच्या रिंगणात आणखी एक ओबीसी चेहरा उतरणार
हेही वाचा.मोठी घोषणा..! तिरंगी लढतीचा फटका अजित पवारांना बारामतीत बसणार ? विजय शिवतारे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार
हेही वाचाइकडे राहुल गांधींची भारत जोडो महाराष्ट्रात ; तिकडे कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला
हेही वाचा…“तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार ;” नाशिकसाठी शांतिगिरी महाराजांनी शड्डू ठोकला