नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून निवडणुक लढण्यास इच्छूक असलेले शांतिगिरी महाराज आता चांगलेच चर्चेत आले आहेत. यातच शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना अधिक उधाण आलं. तर कालच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शांतिगिरी महाराजांपुढे पेच निर्माण झालाय. मात्र निवडणुक लढणारच असा ठाम निर्धार शांतिगिरी महाराज यांच्या भक्तांनी केला आहे.
हेही वाचा…“मी कॉंग्रेसची, अन् कॉंग्रेसच्याच तिकीटावर निवडणुक लढणार”, चंद्रपुरात कॉंग्रेसमध्येच पेच वाढला
मुळचे नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथले रविवारी असलेल्या शांतिगिरी महाराजांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी शिंदेंची भेट घेतली. मात्र शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीवर ब्रेक लागला असल्याची माहिती समोर आली. यातच आता शांतिगिरी महाराज महाविकास आघाडीकडून निवडणुक लढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
याआधी शांतिगिरी महाराज यांना भाजपकडूनही उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. मात्र महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला जाणार असल्याने शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीला ब्रेक लागल्याची चर्चा आहे. यातच आता महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा ठाकरे गटाला मिळणार आहे. त्यामुळे ठाकरे गट शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी देणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा..श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर, महायुतीत पेच वाढला, भाजप काय निर्णय घेणार ?
दरम्यान, २००९ साली शांतिगिरी महाराज यांनी औरंगाबाद मधून लोकसभेची निवडणुक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामाना करावा लागला होता. मात्र शांतिगिरी महाराजांनी तब्बल १ लाख ४८ हजार मतं घेतली होती. परंतु मध्यंतरी दहा वर्ष शांतिगिरी महाराज निवडणुकीपासून दुर झाले होते. आता पुन्हा त्यांनी नाशिकच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. महाराजा यांचे औरंगाबाद, नगर, नाशिक आणि धुळे, जळगाव आणि जालना या पाच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भक्त आहेत. त्यामुळे महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर इतर उमेदवारांना नक्कीच घाम फुटणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सुळे, सुनेत्रा पवार अन् शिवतारेंसह मैदानात, बारामतीच्या रिंगणात आणखी एक ओबीसी चेहरा उतरणार
हेही वाचा.मोठी घोषणा..! तिरंगी लढतीचा फटका अजित पवारांना बारामतीत बसणार ? विजय शिवतारे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार
हेही वाचाइकडे राहुल गांधींची भारत जोडो महाराष्ट्रात ; तिकडे कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला
हेही वाचा…“तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार ;” नाशिकसाठी शांतिगिरी महाराजांनी शड्डू ठोकला
हेही वाचा..“सातारा आपलाच, कामाला लागा,” अजित पवारांनी लोकसभेसाठी कार्यकर्त्यांना दिल्या महत्वाच्या सूचना