पुणे : भाजपामध्ये अस्वस्थता असल्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी असल्याचा दावा केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. नाथाभाऊ आमचे नेते आहेत. त्यांनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, असा टोला लगावतानाच भाजपमध्ये अस्वस्थता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा टोला लगावला आहे. नाथाभाऊ आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलावं. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो, असं सांगतानाच आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:खं आहे. आमच्याशी धोका झाला. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही, असं पाटील म्हणाले.
भाजप सत्तेसाठी तळमळतयं
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतील सकाळच्या शपतविधी बद्दल प्रश्न विचारला असता, फडणवीसांनी अजित पवारांसोबत घेतलेल्या सकाळच्या शपतविधीची प्रांजळपणे कबुली दिली. यावरून आता एकनाथ खडसे यांनी खोचक टिका केली आहे. ते म्हणाले, मी भाजपमध्ये असताना मी अनेक नेत्यांना भाजपात प्रवेश दिली. मी त्यांनी जवळून ओळखतो. त्यांच्या भावना समजतो. त्यांच्या नेमके काय चालायचे हे मला चांगले ठावूक आहे. भाजपच्या आमदारांमध्ये सत्ता नसल्यामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे. भाजपचे नेते वारंवार सांगत आहेत की हे सरकार पडेल. यावरून दिसून येते की त्यांच्यात किती नाराजी पसरली आहे. भाजपचे नेते सत्तेसाठी तळमळत आहेत. मला माहिती आहे, सत्तेसाठी भाजप किती भुकेला आहे, असे खडसे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Read Also :
- मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान मोदींना भेटणार
- .‘कोविडला निमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची काय लायकी राहिली असती
- “संभाजीराजे आता आमच्याच मागं येताय ना?”, मराठा आंदोलनाच्या घोषणेनंतर मेटेंची टीका
- …अन्यथा थेट जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करू; मुख्यमंत्र्यांचा इशारा