मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, ठाकरे सरकारच्या ११ घोटाळेबाज नेत्यांची नावे सांगितली होती. त्यांनतर आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यवर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले. तसेच, या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावे आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं सांगितले. तसेच, फक्त तेच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे आहेत आणि यासंदर्भात मंगळवारी ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचं ते म्हणाले.
मुश्रीफ ठोकणार सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा, पाटील-घाटगेंनाही दिला इशारा
दरम्यान, यांनतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, किरीट सोमैया यांच्यावर टीका केली आहे. ‘इतरांच्या मुलांकडे बोटं दाखवताना स्वतःची मुलं काय करतात, मुलगा कुणाला फोन करतो, कुणाकडे पैसे मागतो, याकडेही त्यांनी लक्ष द्यायला हवे. घरातले कुणाकडून खंडणी वसूल करतात, नातेवाईकांच्या किती बोगस कंपन्या आहेत, ते कसे मनी लाँडरींग करतात, या गोष्टी लोकांना माहीती आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी हल्लबोल केला आहे.
१०० कोटीचा दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का? – चंद्रकात पाटील
तसेच, ‘भाजपकडून बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने आरोप करणे, हीच सोमय्यांची ओळख आहे. त्यांनी मंत्र्यांना, सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान रचले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी झाली. मात्र, त्यात काही सापडले माही, ना त्यांच्यावर कोणती कारवाई झाली. त्यामुळे, लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे उद्योग सोमैया करत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
मोठी बातमी: हसन मुश्रीफांनी केला १२७ कोटींचा भ्रष्टाचार, किरीट सोमय्यांचा पुराव्यानिशी आरोप
‘भुजबळ यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप झाला. मात्र, न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले. शेवटी सत्याचाच विजय झाला. कोणताही धोका नसताना केंद्र सरकारने ४० पोलिसांची सुरक्षा देऊन, वेगळे वातावरण निर्माण करण्याचे काम भाजपच्या माध्यमातून सोमैया करत आहेत. ते अगोदर राणे यांच्याकडे बोट दाखवत होते. त्याबाबत आता सोमय्या का गप्प?’ असा सवालही मलिक यांनी यावेळी सोमैय्या यांना केला.
Read Also :
- साकीनाका बलात्कार: पीडितेच्या कुटूंबीयाला २० लाखाची मदत, अॅट्रोसिटीचा गुन्हाही दाखल
- अनिल देशमुखांचा ठावठिकाणा लागावा म्हणून ईडीने उचलले मोठे पाऊल
- ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी विरुद्ध ओबीसीच होणार!’ वडेट्टीवारांचं विधान
- ‘बाळासाहेब थोरातांची भूमिका योग्यच, राष्ट्रवादीने काँगेसमध्ये विलीन व्हावं!’
- गायिका म्हणून नव्हे तर, राजकीय नेत्याची बायको म्हणून लोक माझ्याकडे बघतात – अमृता फडणवीस