मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज बिनशर्त माफी मागितली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मलिकांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
या खटल्यात हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही नवाब मलिकांनी वानखेडे परिवाराबद्दल वक्तव्य केल्यानंतर हायकोर्टाने मलिकांना तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा केली होती. त्यानंतर मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात खेद व्यक्त केला. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. याविषयीचे हमीपत्र त्यांनी न्यायालयात सादर केले. तसंच यानंतर वानखेडे यांच्याविषयी कोणतंही व्यक्तिगत विधान करणार नाही, अशी ग्वाही दिली.
गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव; आशिष शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर
४ पानी प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयात सादर केलंय. ज्येष्ठ वकील ऍस्पी चिनॉय यांच्यामार्फत हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करुन आपले म्हणणे मांडले.सर्वात आधी मी माननीय उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागतो. २५ आणि २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशाचं माझ्याकडून उल्लंघन झालं आहे. मी फक्त माझ्या सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्य केले. कोणाविषयी वैयक्तिक मत व्यक्त केलेले नाही. यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी खेद व्यक्त करत असून, यापुढे अशी विधाने करणार नाही, याची हमी देतो, असे मलीक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
३७८ दिवसांच्या अविरत संघर्षानंतर अखेर कृषी कायदे संसदेत रद्द
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली, असा आक्षेप नोंदवणारा अर्ज ज्ञानदेव वानखेडे यांनी केला होता. त्यावर शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने याविषयी विचारणा केल्यानंतर मलिकांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली.
Read Also :
- राष्ट्रवादीत कलह आणि फायदा काँग्रेसचा; मिळाले उपसभापतिपद
- शिवसेना-राष्ट्रावादीत ठिणगी; शिवसेना सोयीचे वॉर्ड तयार करत असल्याचा दावा
- अनिल परबांकडून ‘त्या’ दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा..!
- विधान परिषदेत कोणाची बाजी? अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
- तुम्ही शिवसेनेचं बोट धरुनच मोठे झालात, हे विसरु नका – शंभुराज देसाई