ठाणे – स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. अशातच आता महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेवरून शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना हवे तसे प्रभाग तयार करते, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. या आरोपांमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे महाविकास आघाडीचे कुठले कर्तृत्व नाही – चंद्रकांत पाटील
निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे प्रभाग रचना करावी आणि त्यांनी नकाशाही जारी करावा. इथून कच्चा माल पाठवायचा आणि मग खात्री करायची, असे होत नाही. तुम्ही काही पक्का वगैरे नाही. तुम्हाला योग्य वाटेल तसे छापा आणि प्रकाशित करायचा. हे आम्ही गेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत पाहिले आहे. तेव्हा आम्ही आणि शिवसेना एकत्र नव्हतो, पण शिवसेना हवी तसे वॉर्ड ठाणे महानगरपालिका निवडणूकीत पाडून घेते, हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.
Read Also :
- अनिल परबांकडून ‘त्या’ दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा..!
- विधान परिषदेत कोणाची बाजी? अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
- तुम्ही शिवसेनेचं बोट धरुनच मोठे झालात, हे विसरु नका – शंभुराज देसाई
- विधानपरिषद निवडणुकीत पक्ष तटस्थ, तरीही बसपाचे दोन नगरसेवक मतदानाला! कोणासाठी?
- “मनसे गळकं घर”; औरंगाबाद मनसेत भूकंप! पदाधिकारी शिवसेनेत..!