नवी दिल्ली : ऐन कडाक्याच्या थंडीत बळीराजानं केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. थंडीतही बळीराजाचा निर्धार काही कमी झाला नव्हता. कडाक्याच्या थंडीत, रखरखत्या उन्हाळ्यात आणि कोसळणाऱ्या पावसातही बळीराजा देशाच्या राजधानीच्या सीमांवर आपल्या हक्कांसाठी लढा देत होता.
मोठी बातमी : एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई
वर्षभरानंतर अखेर या आंदोलनाला यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीच्या पवित्र दिवशी केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत आहे अशी घोषणा केली. आम्हीच शेतकऱ्यांना कायद्यांच्या बाबतीत सांगण्यास कुठंतरी कमी पडलो. मात्र हे शेतकऱ्यांचं सरकार असल्यानं ऐकणार देखील शेतकऱ्यांचंच अशी भूमिका घेत मोदींनी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.
पुण्यातील भाजपचे महापौर अडचणीत; मुरलीधर मोहोळ यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
यानंतरही शेतकरी नेत्यांनी आंदोलन सुरु ठेवले होते. जोपर्यंत संसदेत एकमुखाने हे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यँत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. मात्र आता केंद्र सरकारने विविध मुद्यांवर सहमती दर्शविल्यानंतर शेतकरी संघटनांनी 378 दिवसांनंतर ऐतिहासिक शेतकरी आंदोलन स्थगित केलं आहे. या सोबतच गेल्या एक वर्षाहून अधिक काळ आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हा आपला विजय मानला. सध्या देशाची राजधानी दिल्लीच्या सीमांवर आता जल्लोष सुरु आहे.
संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही जमिनीवर बसू; प्रविण दरेकरांचा आक्रमक पवित्रा
दिल्लीतील गाजीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. आंदोलन स्थगित झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला. यावेळी अनेक शेतकरी आपल्या सामानाची बांधाबांध करताना दिसले. शेतकरी म्हणाले की, या निर्णयामुळे ते खूप खूश आहेत आणि आता आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत आहेत.
Read Also :
- गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव; आशिष शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर
- स्वातंत्र्य तर संघर्षातून मिळाले, भीक म्हणून मिळाल्या तर त्या पदव्या आणि पुरस्कार – कन्हैयाकुमार
- भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे महाविकास आघाडीचे कुठले कर्तृत्व नाही – चंद्रकांत पाटील
- शरद पवारांनी सांगितलं, 2024 ला सुद्धा ठाकरे सरकारचं येणार अन् मुख्यमंत्री…; जितेंद्र आव्हाड
- भाजपचा कुठलाही नेता, कोणत्याही महिलांबाबत अभद्र शब्द वापरू शकत नाही – देवेंद्र फडणवीस