मुंबई : कोरोना व्हायरस महामारीची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांकडून सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल देखील 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या 40 वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षांतील विकास दर उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे. यावरून, निशाणा साधताना जयंत पाटील हे केंद्र सरकारने जनतेला दिलेले रिटर्न गिफ्ट असल्याचे म्हणत टोला लगावला आहे.
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही, पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत, देशाचा जिडीपी मायनसमध्ये आहे, महागाईचा नुसता भडका उडला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे. pic.twitter.com/nRQveVolFo
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 1, 2021
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही, पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत, देशाचा जीडीपी मायनसमध्ये आहे, महागाईचा नुसता भडका उडला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे, असा सणसणीत टोला जयंत पाटील यांनी ट्विट करत मोदी सरकारला लगावला.
Read Also :
- ‘…तेव्हा भाजपचे अतुल भातखळकर मनसेचे तिकीट मागायला आले होते’
- ‘मिळेल त्या वाहनाने राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर या’
- ‘पेट्रोल-डिझेलची ‘शंभरी’ केल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन’, काँग्रेसचा पुणेरी टोला
- पहिल्यांदा संसदेत जाताना शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला
- ‘संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर केला’