मुंबई : ठाकरे सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरुन विरोधी पक्षाने आघाडी सरकारला लक्ष्य केले असून, यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीं ठाकरे सरकारवर टीका केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेतला असून, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभागृहातील भाषणाचा व्हीडिओ ट्विटरवर शेअर करत, फडणवीस दारुबंदी उठवण्याचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देताना यात ऐकायला मिळत आहेत.
दारूबंदी तो बहाणा है
"मालपाणी" निशाना है…. नशा दौलत का ऐसा भी क्या
के तुझे कुछ भी याद नहीं
क्या हुआ तेरा…….. pic.twitter.com/djS80oiWbZ— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 30, 2021
“दारुबंदी हा केवळ एक बहाणा आहे. चंद्रपुरातील मोजके लोक या अवैध दारुविक्रीतून ‘मालपाणी’ मिळवतात. तुम्ही दारुबंदीचा निर्णय उठवल्यास त्यांचं मालपाणी बंद होईल,” असा फडणवीस यांच्या बोलण्याचा आशय आहे. मात्र, आता जेव्हा ठाकरे सरकारने चंद्रपुरातील दारुबंदी उठवली आहे. तेव्हा हेच भाजपचे नेते आघाडीवर टीका करत आहेत.
दरम्यान, आघाडी सरकारने चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध डावलून, जिल्ह्यातील दारुबंदी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या दारूबंदीचे दुष्परिणाम जिल्ह्यात दिसू लागल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आले आहे.
Read Also :
- ‘…तर बाळासाहेब ठाकरे वरून तुमच्या थोबाडीत मारतील!’
- मोदी सरकारच्या कारभाराविरोधात राज्यभर काँग्रेसची निदर्शने, केली मोदींच्या राजीनाम्याची मागणी
- ‘औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात’
- गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला उठवण्यासाठी, ओबीसींना आंदोलन करावंच लागेल!
- ‘ओबीसी आरक्षणप्रश्नी आता केंद्रानेच हस्तक्षेप करावा!’