मुंबई : केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या आणि इंधनाच्या किंमतीत दरवाढ केली आहे. यावरून देशभरातील भाजपविरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून, या दरवाढविरोधात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला पवित्रा आक्रमक घेतला आहे. “तुमचं सिलेंडर, आमच्या घराच्या सुख-समृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस याविरोधात आंदोलन छेडल्याशिवाय शांत होणार नाही,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.
ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात
राष्ट्रवादीकडून राज्यभरात गॅसच्या आणि इंधनाच्या किंमतीत झालेल्या दरवाढी विरोधात दोन दिवसांचं राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. आज याची सुरुवात जयंत पाटील यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी, केंद्राच्या या महागाई विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसने आज आणि उद्या राज्यभर आंदोलनाची साद दिली आहे. हे आंदोलन महामारीचे सगळे नियम पाळून केलं जावं,” असं आवाहन केलं.
जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
तसेच, “जगावं की मरावं” असा प्रश्न हॅम्लेटच्या नाटकात विचारला होता. या मोदी सरकारमुळे वाढलेल्या महागाईनं, वाढलेल्या इंधन दरवाढीनं आणि गॅस-सिलेंडरच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे, तसेच गृहिणींचे बजेट कोलमडून पडलं आहे. त्यामुळे, त्यांच्यासमोर “जगावं की मरावं” असा प्रश्न असून, या प्रश्नाचे उत्तर ‘मन की बात’ मध्ये ‘मरावंच’ असं दिसतं,” असा खोचक टोला त्यांनी पंतप्रधांनाना लगावला आहे.
Read Also :
- शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या खात्यात भ्रष्टाचार? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना ‘लेटरबॉम्ब’
- जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- “अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
- ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात
- जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…