मुंबई : पक्षाचे सर्वाधिक संख्याबळ, विधीमंडळ आणि संसदीय बहुमत आमच्याकडे असून पक्ष आणि चिन्हाचा विचार करताना संख्याबळाचा विचार व्हावा. असा युक्तिवाद अजित पवार गटाने निवडणुक आयोगात केला आहे. त्याचसोबत शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात. असा गंभीर आरोप देखील अजित पवार गटाने आयोगात केल्याने राष्ट्रवादीची लढाई खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे.
हेही वाचा…पाय मुरगळला, इंजेक्शन दिलं अन् रूग्ण दगावला, सरकारच्या आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार थांबता थांबेना
महाराष्ट्र विधानसभेतील ५३ पैकी ४२ आमदार आणि विधानपरिषदेतील ९ पैकी ६ आमदार आमच्याकडे आहेत. यातच लोकसभेतील पाच खासदारांपैकी १ आणि राज्यसभेतील ४ खासदारांपैकी १खासदार आमच्या बाजूनं असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला, त्यामुळे आमदारांची संख्या महत्वाची असून त्याआधारे पक्ष कुणाचा ठरवता येईल असंही अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांच्या ‘त्या’ प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळलं, पण ठाकरेंवर जोरदार घणाघात
राष्ट्रीय कार्यकारिणीआधी जयंत पाटलांची नियुक्ती ही पक्षघटनेला धरून नाही. जयंत पाटलांचा कार्यकाळ संपल्यावर नियुक्ती झाली. त्यावेळी निवडणुक घेण्यात आली नव्हती. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात. त्यांच्या एका पत्राने नियुक्त्या केल्या असून हा मनमानी कारभार आहे. असंही अजित पवार गटाकडून निवडणुक आयोगात सांगण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात घमासान, अजित पवार गटाने आणले गाडीभर पुरावे
हेही वाचा…“जयंत पाटलांची नियुक्ती बेकादेशीर,” निवडणुक आयोगात अजित पवार गटाचा मोठा युक्तिवाद
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळाबाबत सुनावणी सुरू,आयोगात ‘हे’ बडे वकिल युक्तिवाद करणार
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निकालाआधीच शरद पवार गटाची मोठी खेळी, दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…शिंदे ठाकरेंच्या विरोधात आक्रमक, मुंबई महापालिकेच्या घोटाळ्याची चौकशी मातोश्रीपर्यंत जाण्याचे संकेत