नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हांबाबत आज निवडणुक आयोगात सुनावणी होत आहे. सुनावणीसाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित असून त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, खासदार वंदना चव्हाण निवडणुक आयोगात दाखल झाले आहेत. शरद पवारांच्या बाजूने वकिल अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहे. परंतु त्याआधी शरद पवारगटाकडून मोठी खेळी करण्यात आली आहे.
हेही वाचा…“संकट आल्यावर एक फुल दोन हाफ कुठे गेले ?” उद्धव ठाकरे राज्य सरकारवर संतापले
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बंडखोर ४० आमदारांच्या विरोधात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये अजित पवारांसह गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात या आमदारांच्या अडचणीत वाढ होणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…ठाकरेंची ‘ती’ चूक शरद पवार टाळणार, अन् निवडणुक आयोगाचा निकाल जिंकणार ? वाचा सविस्तर
दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्रकरणाबाबत शरद पवार गटाने निवडणुक आयोगात १ लाखांपेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. तर अजित पवार गटाकडून देखील प्रतिज्ञापत्र दाखल केले असून राष्ट्रवादीच्या विधानसभा आमदारांपैकी ४३ आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा प्रफुल पटेल यांनी केला आहे. त्यामुळे या निकालाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे ठाकरेंच्या विरोधात आक्रमक, मुंबई महापालिकेच्या घोटाळ्याची चौकशी मातोश्रीपर्यंत जाण्याचे संकेत
हेही वाचा…पाय मुरगळला, इंजेक्शन दिलं अन् रूग्ण दगावला, सरकारच्या आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार थांबता थांबेना
हेही वाचा…अजित पवारांच्या ‘त्या’ प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळलं, पण ठाकरेंवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले अन्..,” ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…शिंदे अन् अजित पवार गटातले नेते भिडले, अन् अधिकाऱ्यांनी एका वाक्यात विषय संपवला