मुंबई : राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोगात सुनावणी होत आहे. शरद पवार स्वत: सुनावणीच्या वेळी उपस्थित असून त्यांनी मुख्य निवडणुक आयोगाची भेट घेतली आहे. यावेळी शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनु सिंघवी तर अजित पवार गटाकडून महेश जेठमलानी युक्तिवाद करीत आहेत. यातच आता अजित पवार गटाकडून जयंत पाटलांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला आहे.
हेही वाचा…“एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले अन्..,” ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्याविरोधात बंड पुकारल्यानंतर अजित पवार गटाने सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. त्यानंतर आता निवडणुक आयोगात अजित पवार गटाकडून कागदपत्र सादर केली असून शरद पवार गटाकडून नियमाचं पालन होत नाही आहे. असा युक्तिवाद करत जयंत पाटील यांची नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…शिंदे अन् अजित पवार गटातले नेते भिडले, अन् अधिकाऱ्यांनी एका वाक्यात विषय संपवला
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कशी झाली ? पक्षाचं काम कसं चालतं यासंदर्भात युक्तीवाद केला जात आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, आमदारांची संख्या महत्वाची आहे, असं देखील अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे. पक्ष घटनेचं पालन होत नाही असा दावा देखील अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. यातच अजित पवार गटाकडून निवडणुक आयोगात १ लाख ६२ हजार प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळाबाबत सुनावणी सुरू,आयोगात ‘हे’ बडे वकिल युक्तिवाद करणार
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निकालाआधीच शरद पवार गटाची मोठी खेळी, दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…शिंदे ठाकरेंच्या विरोधात आक्रमक, मुंबई महापालिकेच्या घोटाळ्याची चौकशी मातोश्रीपर्यंत जाण्याचे संकेत
हेही वाचा…पाय मुरगळला, इंजेक्शन दिलं अन् रूग्ण दगावला, सरकारच्या आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार थांबता थांबेना
हेही वाचा…अजित पवारांच्या ‘त्या’ प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळलं, पण ठाकरेंवर जोरदार घणाघात