मुंबई: अतिवृष्टीमुळे कोकण पश्चिम महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांचं अतोनात नुकसान झालंय. घरंच्या घरं वाहून गेलीत मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय… तर दुसरीकडे निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकणातही अक्रित घडलं. आपत्तीग्रस्तांना मदत करत असताना कोकणसाठी कडक निर्णय घेण्याची गरज असल्याचं महत्त्वाचं भाष्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं.
हे पण वाचा: कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; २ जण गंभीर जखमी
वारंवार घडणार्या या घटनांचा विचार करता शासन मदत करणारच आहे, पण यावर कायमस्वरुपी काय उपाययोजना करायच्या यावरही विचार सुरु आहे. कोकण हा इको सेंसेटीव्ह झोन जाहीर करण्याची शिफारस गाडगीळ समितीने केली आहे. त्यामुळे नैसर्गिक वैभवाला छेडछाड केली तर असे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे कडक निर्णय घेण्याची गरज मला तरी वाटते, असं वडेट्टीवार म्हणाले.
हे पण वाचा: आठवडा उलटून गेला…पूरग्रस्तांसाठी पॅकेज कधी? अजित पवारांनी केले भाष्य
शासन कोणकोणते निर्णय घेऊ शकतो?
ज्या गावाचं पुनर्वसन करायचं ती घरं म्हाडाने बांधावी आणि तिथल्या नागरी सुविधा शासन देईल असा विचार आहे. तीन टप्प्यात यांचं पुनर्वसन होण्याची आवश्यकता आहे. दरडी खालील गावं शोधण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत सौम्य धोकादायक गावं कोणती? तसंच कायम पूर येतो अशा गावाचा शोध घेऊन त्यांचं पुनर्वसन करणं असं तीन टप्प्यात हे काम करायचं आहे, असं वडेट्टीवारांनी सांगितलं.
हे पण वाचा: “पंडित नेहरुंबद्दल प्रचंड आदर, पण…”, राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने खळबळ
मुख्यमंत्र्यांबरोबर कोणत्या विषयांवर चर्चा?
आता नुकसानग्रस्तांना काय मदत करता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहोत. शेतीचं नुकसान झालं आहे, रस्ते, वीजेचं नुकसान झालंय, या सगळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेली गावं, पूर रेषेत असलेले गावं यांचं पुनर्वसन करणं याबाबतही चर्चा होणार आहे.
Read Also :
- कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; २ जण गंभीर जखमी
- “पंडित नेहरुंबद्दल प्रचंड आदर, पण…”, राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने खळबळ
- “पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत शरद पवारांचा सल्ला योग्यच पण…”, पवारांच्या आवाहानाला फडणवीसांचं उत्तर
- पूरग्रस्त भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांना, पवारांनी केले कळकळीचे आवाहन
- “देशाला संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज आणि त्यांचं नेतृत्व हे राष्ट्रीय स्तरावरचं”