नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकच्या जागेसंदर्भातील निर्णय अंतिम टप्प्यात आला असून शिवसेनेच्या वतीने उमेदवार बदलण्याची चर्चा होत आहे. त्या दृष्टीने जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाचारण केले आहे. त्यानुसार ते ठाणे येथे रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक आज दुपारी होत असून त्यामुळे नाशिकच्या जागेचा फैसला आज सांयकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय,” अजितदादा गटातल्या महिला नेत्याची कडाडून टिका
विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा तिकीट मिळण्यासाठी ते मागील काही दिवसापासून प्रयत्न करतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात यावी, यासाठी अजित पवार गट सातत्याने मागणी करतांना दिसत आहेत. मात्र भुजबळांना भाजपसह मराठा समाजानेही विरोध केला आहे. त्यामुळे याठिकाणी नवा उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.
हेही वाचा…बारामतीत शिवतारेंचा बंड थंड का झाला ? शिवतारेंनीच केला मोठा खुलासा, म्हणाले….
अशातच ठाकरे गटात असलेले आणि लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेले अजय बोरस्ते आज शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना नाशिकची उमेदवारी दिल्याने ते नाराज आहेत. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याची तयारी दर्शविली आहे. तर मी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय दिले ? “नांदेडमध्ये अमित शाहांचा सवाल
हेही वाचा…“ताई काळजी करू नका विजय तुमचाच”, अल्पसंख्याक समाजातील महिलांची अर्चना पाटलांना ग्वाही
हेही वाचा…“शिरूर लोकसभेचा खरा नायक म्हणजेच शिवाजी आढळराव पाटील, त्यांनाच निवडून द्या,” अपुर्व पाटलांचं आवाहन
हेही वाचा…शिवतारेंनी माघार घेतली, अजितदादांकडून बारामतीकरांसाठी आश्वासनांची खैरात वाटली
हेही वाचा…“कॉंग्रेस पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने धंगेकर ग्रासले”, पक्षांतर्गत आणखी एक वाद चव्हाट्यावर