मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात संघर्ष सुरु आहे. याचा परिणाम असा की भाजपचे काही नेते शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांना टार्गेट करत आहेत तर शिवसेनेचे काही नेते भाजपच्या आमदारांना, नेत्यांना टार्गेट करत आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या पाठीमागे किरीट सोमैया हे हात धुवून मागे लागले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांचे दोपोली येथील रिसॉर्ट तोडण्यासाठी भाजपनेते किरीट सोमय्या दोपोलित दाखल झाले आहेत. यावरून आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी चांगलाचं टोला लगावला आहे.
सोमय्यांचा महाविकास आघाडीवर हातोडा; अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी दापोलीत
कुणाला कुदळ, कुणाला फावडा जे घ्यायचं आहे ते घ्या परंतु हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही. तो लढतही राहणार आणि जिंकतही राहणार आहे. असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासंदर्भात बोलताना त्यांना आम्ही फार किंमत देत नाही. नितेश राणे, निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित आहे. असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
जुन्नर बिबट सफारी प्रकल्प वाद : अजित पवारांनी पुन्हा ठणकावलं
परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथे असलेले साई रिसॉर्ट हे अनधिकृत आहे आणि त्यावर कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमैया हे आज सकाळी दीडशे गाड्यांचा ताफा घेऊन दापोलीत धडकले आहेत. भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावलेल्या १५० गाड्या आणि हातात भलामोठा एक हातोडा घेऊन किरीट सोमैया हे दापोलीत ठाण मांडणार आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांना का वाचवत आहेत ? आणि पुरावे देऊनही परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई का केली जात नाही ? याचा जाब संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी सोमैया हे दापोलीत पोहोचले आहेत.
” अडाणी आमदार संतोष बांगरला घोडा लावणार “; वचिंतने दिला संतप्त इशारा
दरम्यान, अनिल परब यांचा रिसॉर्ट हा बेकायदेशीर आहे. मी जो हातोडा घेऊन चाललो आहे हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे, मला अटक करुन दाखवा असं खुलं आव्हान किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हात पाय कधीच तोडले असते, मात्र मला केंद्राने सुरक्षा दिली आहे म्हणून मी वाचलो असं देखील किरीट सोमैया यांनी म्हटलं आहे.
Read also:
- कुणाला कुदळ, फावडा घ्यायचंय ते घ्या, मर्द मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही
- आयुष्य़ खुप कलाटण्या देतंय; हवं तर विजय चौकात फाशी द्या; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- “वास्तविक पाहता मला राजकारणारपेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता”: देवेंद्र फडणवीस
- अजित पवारांची ‘ती’ खंत योग्यच; गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया
- उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय कधीतरी भरून निघेल; खडसेंचा फडणवीसांवर रोष