नवी दिल्ली : राज्यात गेल्या काही दिवसापासून केंद्रीय तपास यंत्रणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांव सध्या या यंत्रणाचा ससेमिरा लागला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. आता यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार यांनी लोकसभेत यांवरून विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
” अडाणी आमदार संतोष बांगरला घोडा लावणार “; वचिंतने दिला संतप्त इशारा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्ही म्हणता की, सीबीआय, ईडी, आयकर विभाग या स्वतंत्र तपास संस्था आहेत. या तपास संस्था स्वतंत्र आहेत तर मग आम्हाला ट्विटवर कोणावर धाड पडणार हे 4 ते 5 दिवस आधीच कसं समजतंय. एखादा नेता 15 दिवसात तुरूंगात जाणार असं बोलणारे नेते भविष्य सांगणार आहेत का ? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार हे आधीच कसं माहिती होतं.
मोठी बातमी : 5 एप्रिलला राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्याकडून काही चूक झाली तर मला फाशी द्या, याठिकाणी नाही. तर भर चौकात फाशी द्या. आमची चुक झाली तर आमच्यावर खटला चालवा. ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. आयुष्य़ खुप कलाटण्या देतं आहे. आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल. परंंतु म्हणून आम्हाला फाशावर देणार का ? पारदर्शक काम करा आणि न्याय करा, अशी मागणी देखील त्यांनी केंद्र सरकारकडे केली.
बच्चू कडूंच्या आईच्या तेरविच्या कार्यक्रमात पोलिसानी गायले भजन; प्रचंड व्हायरल
दरम्यान, दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी विरूद्ध भाजप संघर्ष पेटला आहे. सत्ताधारी नेत्यांवर भाजप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तर भाजपवर देखील सत्ताधारी पक्षाचे नेते निशाणा साधत आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलाचं तापलेलं दिसून आलं आहे.
Read also:
- “वास्तविक पाहता मला राजकारणारपेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता”: देवेंद्र फडणवीस
- अजित पवारांची ‘ती’ खंत योग्यच; गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया
- उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय कधीतरी भरून निघेल; खडसेंचा फडणवीसांवर रोष
- सोमय्यांचा महाविकास आघाडीवर हातोडा; अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी दापोलीत
- जुन्नर बिबट सफारी प्रकल्प वाद : अजित पवारांनी पुन्हा ठणकावलं