पुणे : मंचर येथील सभेत शिवसेना शिंदे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर आढळराव पाटलांना आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात येणार आहेत. परंतु याला अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी प्रखर विरोध केला आहे. तर आढळराव पाटलांच्या उमेदवारीला विरोधक करत राजकारणातील कट्टर विरोधक भाजपचे आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…अवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?
शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटलांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु याला अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी विरोध केला आहे. तर शिरूरमधून लोकसभेची निवडणुक लढण्यासाठी इच्छूक असलेले भाजपचे आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी विलास लांडे यांनी केली आहे. विलास लांडे आणि महेश लांडगे हे राजकीय कट्टर विरोधक आहेत. परंतु आढळराव पाटलांना विरोध म्हणून लांडे यांनी लांगडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…“बारणेंनी कमळावर निवडणुक लढवावी, मग भाजपकडे माणसं नाहीत का ?” सुनील शेळके यांचा भाजपला सवाल
दरम्यान, आयात उमेदवाराला उमेदवारी देण्यापेक्षा भाजप आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणीच विलास लांडे यांनी केलीय. तसेच महेश लांडगे हे काम करण्यास तयार आहे. शिरूर लोकसभेसाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे महायुतीने महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात यावी असं विलास लांडे यांनी म्हटले आहे. तर अजित पवार देखील योग्य तो निर्णय घेतील. असे लांडे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…६२ देश फिरून भारतात आलेल्या ब्राझिलियन महिलेवर ७ जणांनी केला ब’ला’त्का’र, आव्हाडांची संतापजनक पोस्ट
हेही वाचा…भाजपच्या मित्र पक्षाला शरद पवार लोकसभेची जागा देणार, सुप्रिया सुळेंनाही मोठी ताकद मिळणार
हेही वाचा…भाजपचा महाराष्ट्रावर डोळा, भाजपचे दोन दिग्गज आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
हेही वाचा…भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा , मोदींना तिसऱ्यांदा संधी, तर पहिल्या यादीत २८ महिलांचा संधी
हेही वाचा..अवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?