नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पहिल्या उमेदवार यादीची प्रतिक्षा असतानाच अवघ्या २४ तासांमध्ये दोन खासदारांनी राजकारणाला तडकाफडकी रामराम केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा या दोन भाजप खासदारांनी राजकारणातून सन्यांस घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…शरद पवारांसमोरच फडणवीसांकडून अजितदादांचं कौतूक, म्हणाले, अजितदादांचं काम म्हणजे…
लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता असून यातच उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपची मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीसाठी संपुर्ण देशभरातून भाजपचे नेते उपस्थित होते तर यात १६ राज्यांच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यातच आज सांयकाळी पाच वाजता पहिल्या १०० उमेदवारांची यादी समोर येणार आहे. परंतु त्याआधीच भाजपच्या खासदारांनी राजीनामा दिल्याने याची एकच चर्चा सुरू झाली आहे .
हेही वाचा…सुनेत्रा पवारांनी घेतली थोपटेंची भेट, राजकीय हालचालींना वेग, मतांचं गणित ठरणार
मी पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना माझ्या थेट निवडणुकीच्या कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून मी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रीत करू शकेन, असं म्हणत हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तर गेली दहा वर्षे भारतातील आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळाले असेही त्यांनी लिहिले. तसेच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेतृत्वाने दिलेल्या अनेक संधींचा आशीर्वाद मिळाला आहे. त्या सर्वांचे आभार असेही त्यांनी लिहीले आहे.
दरम्यान, तर दुसऱ्या बाजूला गौतम गंभीर यांनी देखील आशाच प्रकारचा आशाय लिहून राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपमध्ये नेमकं काय चालू आहे ? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बारणेंनी कमळावर निवडणुक लढवावी, मग भाजपकडे माणसं नाहीत का ?” सुनील शेळके यांचा भाजपला सवाल
हेही वाचा…पुण्यातल्या तुळापुरातील कार्यक्रमात नाराजीनाट्य, अमोल कोल्हे अन् अशोक पवारांनी अर्ध्यावरूनच सोडले व्यासपीठ
हेही वाचा…“भाजपचा दुपट्टा दुसऱ्यांच्या गळ्यात टाकतील, अन् एक दिवस हेच गळ्यात घंटा बांधून रस्त्यावर फिरतील”
हेही वाचा..“महायुतीचा कार्यक्रम अन् व्यासपीठावर शरद पवारांचीच हवा,” फडणवीसांना डिवचणारा ‘तो’ व्हिडीओ आला समोर
हेही वाचा…“नमो महारोजगार मेळाव्यातून तरूणांची फसवणूक,” विरोधकांचा जोरदार हल्लाबोल