बारामती : नमो महारोजगार मेळावा नुकताच बारामती याठिकाणी पार पडला. या मेळाव्याच्या आधी शरद पवारांनांच निमंत्रण न दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने सुधारित निमंत्रण पत्रिका काढत शरद पवारांना निमंत्रण देण्यात आलं. यानंतर एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. यातच आता या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचे भरभरून कौतूक केलं आहे.
महाराष्ट्रात एखादं चांगलं काम करण्याचं ठरलं तर हा मंच त्याचा साक्षीदार आहे की, सगळं मिळून चांगली कामं करू शकतो. त्यामुळेच महारोजगार मेळावा होत आहे. ५५ हजार पद अधिसुचित करण्यात आली आहे. तरूणं सातत्याने आमच्याकडून रोजगार मागत आहेत. आम्हाला रोजगार हवा आहे. एकीकडे रोजगार आहे. दुसरीकडे रोजगार घेणारे आहेत. त्यामुळे या दोघांना एकत्रित आणण्याचं काम आम्ही केलं आहे. अजिदादांना पुढाकर घेऊन पश्चिम महाराष्ट्रात नमो महारोजगार मेळावा घेतला आहे. याठिकाणी तरूणांना मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहेत. आम्ही कंत्राटवर काम करणारे आहोत. आम्हाला दर पाच वर्षांनी कंत्राट रीनीव्ह करावं लागतं. चांगलं काम केलं तर कंत्राट रिनीव्ह होतो नाही तर लोकं आम्हाला घरी बसवतात. असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची दलित युवकास बेदम मारहाण”, विरोधकांचा संताप, कारवाई करण्याची मागणी
नागपुर येथील महारोजगार मेळाव्यात अकरा हजार तरूणांना नोकरी मिळाली. यामध्ये लाखांपर्यंत पॅकेज तरूणांना मिळाले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याचं नियोजन केलं. त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात मेळावे घेण्यात यावे, असं शिंदेंनी म्हटलं. त्यानंतर या मेळाव्यासाठी ३६ हजार अर्ज आहेत आणि ५५ हजार पद आहेत. उद्यापर्यंत अजून अर्ज येणार आहे. सगळ्यांना कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. असेही त्यांनी सांगितले.
बारामतीचा बस स्टॅंड हा एखादा विमानतळासारखा आहे. यातच पोलिस स्टेशन, मुख्यालय, किंवा कॉटर्स हे सरकारी बांधकाम असावं असं वाटतच नाही. अशा पद्धतीचं मुख्यालय अजितदादांनी बारामती करांनी दिलं आहे. यातच आता मला बारामतीला पोस्टिंग द्या, अशी मागणी माझ्याकडे करतील. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…भाजपची मॅरेथॉन बैठक, लोकसभेच्या १०० जागा ठरल्या, उमेदवारही जाहीर, मोदींसह, शाह मैदानात
विशेष लक्ष घालून अजितदादांनी बारामतीत चांगल्या इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे मला आता इतका मोह होत आहे की, त्यांचं पीएमसी म्हणून अजितदादांनाच नियुक्त करून टाकावं. यातच पीएमसीच का ? खात्याचं आम्हाला द्या? असंअजितदादा हळूच म्हणतील. परंतु मी ते मी तुम्हाला देणार नाही. ते माझ्याकडेच ठेवेन. परंतु तुम्हाला चांगल्या इमारती बांधण्यासाठी मदत देईन. बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या अतिशय सुंदर इमारती झाल्या आहेत. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचासुनेत्रा पवारांनी घेतली थोपटेंची भेट, राजकीय हालचालींना वेग, मतांचं गणित ठरणार
हेही वाचा…“काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढू”, वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा..लोकसभा निवडणुकीत मराठा समाज उभे करणार २५० उमेदवार, भाजपात गेलेल्या ‘या’ नेत्याला केलं टार्गेट
हेही वाचा…“निलेश लंकेंनी तुतारी किंवा मशाल हाती घेऊन निवडणुक लढवावी,” ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
हेही वाचा…“सगळ्या पक्षाला संपवून फक्त एकट्या भाजपला जिवंत राहायचं आहे का ?” कोकणाच्या जागेवरून भाजप अन् शिंदे गटात जुंपली