मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या काळात राज्यात ड्रग्जचा विळखा, हत्यांची मालिका, डान्सबार आणि गुंडांना राजाश्रय यावरून सरकारच्या कामगिरीची चिरफाड केली.
हेही वाचा…“नादाला लावलेली माणसं फार काळ राहत नाहीत”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संत महात्म्यांचा महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख आहे. परंतु गेल्या दोन वर्षात घोटाळेबाजांचा, वसुलीचा, खोकेबाजारांचा, पक्ष फोडोफोडीचा, गुंडाना राजाश्रय देणारा महाराष्ट्र अशी राज्याची नवी ओळख करण्यात शिंदे सरकारने मोठी प्रगती केली असल्याचा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा…प्रति, महायुती सरकार, पत्रास कारण की…., विरोधकांनी महायुती सरकारला लिहिले पत्र, अनेक गोष्टींचा उल्लेख
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, कोणी पुड्या सोडतो कोणी चर्चा करतो, पण महाराष्ट्र उध्वस्त होताना त्या फौजेत मी सहभागी होणार नाही… काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढू .. जिथे आहोत तिथेच पक्षासाठी इमानदारीने काम करणार! असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..लोकसभा निवडणुकीत मराठा समाज उभे करणार २५० उमेदवार, भाजपात गेलेल्या ‘या’ नेत्याला केलं टार्गेट
हेही वाचा…“निलेश लंकेंनी तुतारी किंवा मशाल हाती घेऊन निवडणुक लढवावी,” ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
हेही वाचा…“सगळ्या पक्षाला संपवून फक्त एकट्या भाजपला जिवंत राहायचं आहे का ?” कोकणाच्या जागेवरून भाजप अन् शिंदे गटात जुंपली
हेही वाचा…“शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची दलित युवकास बेदम मारहाण”, विरोधकांचा संताप, कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…भाजपची मॅरेथॉन बैठक, लोकसभेच्या १०० जागा ठरल्या, उमेदवारही जाहीर, मोदींसह, शाह मैदानात