पुणे : बारामती येथील नमो महारोजगार मेळावा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तुळापुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ स्मारकाचं भुमिपुजन करण्यात आलं. यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्रीमंडळ देखील उपस्थित होते. तर राज्य सरकारकडून शरद पवार गटातील खासदार आमदारांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु कार्यक्रम अर्ध्यातच सोडून खासदार अमोल कोल्हे आणि अशोक पवार व्यासपीठ सोडून निघून गेले. त्यामुळे याची आता जोरदार चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा…“काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढू”, वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
शंभुभक्त म्हणून या क्रमाचं स्वागतच आहे, अन् त्यासाठी आम्ही त्याठिकाणी गेलो होतो. यातच अजितदादांचं मी आभार देखील मानलं आहे. परंतु हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या हायजॅक करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे नक्कीच दुर्दैव आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असताना छत्रपती संभाजी राजे यांच्या जीर्नोद्धाराचा कार्यक्रम आहे की, एखादा राजकीय कार्यक्रम आहे. असा संभ्रम निर्माण करणारे फ्लेक लावण्यात आले होते. एका प्लेक्सवर तर इतर सर्व नेत्यांचे फोटो होते. परंतु त्यावर संभाजी महाराजांचा एकही फोटो नव्हता. असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा..लोकसभा निवडणुकीत मराठा समाज उभे करणार २५० उमेदवार, भाजपात गेलेल्या ‘या’ नेत्याला केलं टार्गेट
कोनशिलेवर स्थानिक प्रतिनिधी म्हणून मी आणि अशोक पवार यांचंही नावं नव्हतं. यातच माझं नगरमध्ये कार्यक्रम होता. यातच ज्यांना निधी दिला म्हणजे विकास होतो. इमारत उभी राहते. परंतु स्मारकांतून चेतना निर्माण होते. त्यातूनच निर्माण करण्याचे काम केलंय. असेही कोल्हे यांनी म्हटले आहे. तसेच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आल्याचीही टिका त्यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपचा दुपट्टा दुसऱ्यांच्या गळ्यात टाकतील, अन् एक दिवस हेच गळ्यात घंटा बांधून रस्त्यावर फिरतील”
हेही वाचा..“महायुतीचा कार्यक्रम अन् व्यासपीठावर शरद पवारांचीच हवा,” फडणवीसांना डिवचणारा ‘तो’ व्हिडीओ आला समोर
हेही वाचा…“नमो महारोजगार मेळाव्यातून तरूणांची फसवणूक,” विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…शरद पवारांसमोरच फडणवीसांकडून अजितदादांचं कौतूक, म्हणाले, अजितदादांचं काम म्हणजे…
हेही वाचासुनेत्रा पवारांनी घेतली थोपटेंची भेट, राजकीय हालचालींना वेग, मतांचं गणित ठरणार