पुणे : राज्यात महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला शरद पवार यांनी मोठी ऑफर दिली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास सोबत आल्यास त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असं विधान शरद पवार यांनी बारामतीत गोविंदबागेत पत्रकारांशी बोलतांना केलं आहे. एकेकाळचा भाजपचा मित्र पक्ष रासप महाविकास आघाडीसोबत आल्यास भाजपला याचा फटका बसू शकतो तर यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…पुण्यातल्या तुळापुरातील कार्यक्रमात नाराजीनाट्य, अमोल कोल्हे अन् अशोक पवारांनी अर्ध्यावरूनच सोडले व्यासपीठ
महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या जागावाटपात बारामतीसह एकूण ०९ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवार आग्रही आहेत. माढा लोकसभा मतदारसंघ जानकरांना देण्यास शरद पवार तयार आहेत. यातच महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या साठीच्या जागा वाटपाचे सुत्र आता अंतिम टप्प्यात आले असून येथे सहा ते सात मार्च रोजी मुंबईत या संदर्भातील बैठक होणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सोबत आल्यास त्यांना मी माझी लोकसभेची जागा त्यांना द्यायला तयार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“भाजपचा दुपट्टा दुसऱ्यांच्या गळ्यात टाकतील, अन् एक दिवस हेच गळ्यात घंटा बांधून रस्त्यावर फिरतील”
शरद पवारांकडून महादेव जानकर यांना माढा लोकसभेची जागा देण्यास तयार आहे. यातच महादेव जानकर यांचे अनेक समर्थक बारामतीत आहेत. त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात चांगला प्रभावही आहे. जानकरांना माढा लोकसभा मतदारसंघ दिला तर जानकर बारामतीत सुप्रिया सुळे यांना ताकद देतील. त्यामुळे आता जानकर काय निर्णय घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये वंचितचा समावेश देखील करण्यात येणार आहेत. यातच शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांचा राज्यातील संपर्क व प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्यांची असलेली ताकद याविषयी सकारात्मक मत व्यक्त केले. त्यांनी २७ जागांची मागणी केलेली नसून सहा जागा मागितल्याचेही यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपचा महाराष्ट्रावर डोळा, भाजपचे दोन दिग्गज आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
हेही वाचा…भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा , मोदींना तिसऱ्यांदा संधी, तर पहिल्या यादीत २८ महिलांचा संधी
हेही वाचा..अवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?
हेही वाचाअवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?
हेही वाचा…“बारणेंनी कमळावर निवडणुक लढवावी, मग भाजपकडे माणसं नाहीत का ?” सुनील शेळके यांचा भाजपला सवाल