मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अजूनही दिलासा भेटला नाही. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या बेकायदेशीर कारवायांशी संबंधित मनी लाॅंड्रिंग प्रकरणात सध्या नवाब मलिक अटकेत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईतील विशेष न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी त्यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
“शेतकऱ्यांचा मुलगा हेलिकॉप्टरने जाऊ शकत नाही का?” मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
आज मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीस आर. एन. रोकडे यांनी 14 नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यावर नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यावर सुनावणी करता नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे नवाब मलिक यांचा तुरूंगातील मुक्काम तसाच राहणार असल्याने त्यांना अजूनही दिलासा मिळालेला नाहीय.
राज्यात पुन्हा एकदा वाद..! महाराजांच्या आग्रा सुटकेशी तुलना शिंदेंच्या बंडाशी
राष्ट्रवादीचेच आमदार आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना इडीकडून जामीन मंजूर झाला आहे. मात्र हे प्रकरण सीबीआयकडे पण गेल्याने त्यांना अजूनही तुरूंगात राहवं लागत आहेत. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना देखील गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी अटक कऱण्यात आली होती. मात्र त्यांना जामीन मंजूर कऱण्यात आला.
Read also
- “फडणवीसांच्या छत्रछायेत, कंबोज, राणा, सोमय्या, कोश्यारी, लोढा या अमराठी…”; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
- “मंगलप्रभात लोढा यांनी माफी मागितली नाही तर…;” महाराजांच्या बंडाची तुलना शिंदेंच्या गद्दारीशी केल्याने राष्ट्रवादी आक्रमक
- “निवडणुका लागू दे, जनता यांना योग्य जागा दाखवेल”; महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून पवारांचा भाजपला टोला
- स्वत: ला हिंदुत्ववादी म्हणून घेणारेच मंदिराची जमीन हडपाताहेत”; काॅंग्रेसने भाजपला डिवचलं
- भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ.! देवस्थान जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल