मुंबई : संजय राऊत आज पक्षबांधणीसाठी नाशिक दौऱ्यावर असताना, त्यांनी प्रसार माध्यमांसमोर, “राजकारण हे चंचल असतं. या राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कोणीही कोणासोबत जाऊ शकते,” असं विधान करत अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला.
दरम्यान, त्यांच्या या विधानाचा समाचार भाजपने घेतला असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला डिवचताना, “राजकारण हे कधीच चंचल नसतं. राजकीय नेते चंचल असतात. आता शिवसेनेची विचारधाराही अशीच चंचल बनली आहे,” असं वक्तव्य केलं आहे.
तसेच, “संजय राऊत म्हणतात तसं राजकारणात काही घडत नाही. राजकीय नेते चंचल असतात. राजकारण चंचल नसते. पण असे असले तरी किमान आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा तरी चंचल नसावी. मात्र, शिवसेनेबाबत हेच घडत आहे.,त्यामुळे संजय राऊत यांनी विचार याचा विचार करावा,” असा सल्ला त्यांनी राऊत आणि शिवसेनेला दिला आहे.
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून परत एकदा चर्चेत आलेल्या मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “शिवसेनेला ५ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा. मात्र, अजित दादांची मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाहीये,” असं म्हणत त्यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.
Read Also :
- जे नक्षलवाद्यांना कळलं ते सरकारला का कळत नाही ? – विनायक मेटे
- मराठा आरक्षणासाठी दिल्ली दरबारी मोर्चा काढावा? संजय राऊत म्हणतात….
- “ठाकरे सरकारमधील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का?”
- वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे
- “वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय..”